लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : घोडबंदर घाट रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामामुळे शनिवारी देखील नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. एकेरी पद्धतीने सुरु असलेल्या वाहतूकीमुळे वसई – विरार कडून ठाण्याकडे येणाऱ्या नागरिकांचे शनिवारी हाल झाले. या कोंडीमुळे नागरिकांना १५ ते २० मिनिटाच्या अंतरासाठी अर्धा ते पाऊण तास लागत होता.

What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
Dombivli company blast accused in police custody
डोंबिवली कंपनी स्फोटातील आरोपीला पोलीस कोठडी
yogendra yadav
“लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे…”, योगेंद्र यादव यांचं मोठं विधान!
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…
mrunal dusanis says live in america is more difficult than India
“अमेरिकेत राहणं खूप अवघड”, चार वर्षांनी भारतात आलेल्या मृणाल दुसानिसने सांगितलं परदेशातील राहणीमान, म्हणाली…
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
Shikhar Dhawan and Mithali Raj Marriage Talks
‘मी मिताली राजशी लग्न करत आहे…’, शिखर धवनचा मोठा खुलासा, जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण?
vishal patil and uddhav thackeray
“उद्धव ठाकरेंना…”, काँग्रेसला पाठिंबा दिल्यानंतर अपक्ष आमदार विशाल पाटलांचं विधान

आणखी वाचा-Dombivli MIDC Blast: डोळ्यांत काळजी आणि मनात वेदना घेऊन हरवलेल्यांना शोधण्यासाठी नातेवाईकांची धडपड

घोडबंदर मार्ग हा वाहतुकीसाठी महत्त्वाचा मानला जातो. या मार्गावर मोठ्या प्रमाणात जड-अवजड वाहनांची वाहतूक सुरु असते. हा मार्ग अरुंद असल्यामुळे याठिकाणी वाहतूक कोंडी होते. वाहतूक कोंडी रोखण्यासाठी घोडबंदर घाट रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून शुक्रवारपासून हाती घेण्यात आले. या कामामुळे येथील वाहतूक एकेरी पद्धतीने सोडली जात आहे. त्याचा, परिणाम वाहतूकीवर झाला असून कोंडीत भर पडली आहे. शनिवारी सकाळपासून गायमुख चौपाटी ते वसई गोलानी नाका पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वसई – विरारकडून ठाण्याच्या दिशेने येणारी ही वाहने असून नागरिकांचे या कोंडीत प्रचंड हाल झाले.