लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे: जिल्ह्यात मंगळवारी झालेल्या पावसाचा परिणाम शहरातील वाहतूक व्यवस्थेवरही झाला. सोमवारी सकाळी मुकुंद कंपनी येथील पूलाखाली पाणी साचले आहे. त्यामुळे मुकुंद कंपनी ते कळवा पूल चार किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या आहेत. वाहतूक कोंडीमुळे नवी मुंबई येथे कामानिमित्ताने जाणाऱ्यांचे हाल झाले.

Dombivli, poultry farm, Kopar railway station
डोंबिवली जवळील कोपर रेल्वे स्थानकालगत हरितपट्ट्यात कोंबड्यांचा खुराडा, रेल्वे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी
tanker overturned, tanker overturned,
बाह्यवळण मार्गावर खेड शिवापूर परिसरात अल्कोहोलचा टँकर उलटला
mumbai nashik highway, traffic route changes
मुंबई नाशिक महामार्गावर उद्या मोठे वाहतूक बदल
thieves firing at malkapur railway station
मलकापूर रेल्वेस्थानक परिसरात चोरट्यांचा गोळीबार; पाठलाग करणाऱ्या नागरिकांना…

आणखी वाचा- ठाण्यात आठ मीमी पाऊस, घराबाहेर पडलेल्या नागरिकांचे हाल

ठाणे -बेलापूर मार्गावरून हजारो वाहने नवी मुंबईत जात असतात. मंगळवारी मुकुंद कंपनी येथील पूलाखाली पावसाचे पाणी साचले. त्यामुळे त्याचा परिणाम येथील वाहतूकीवर झाला. मुकुंद कंपनी ते नवीन कळवा पूलापर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे. या वाहतूक कोंडीमुळे कामानिमित्ताने बाहेर पडलेल्या नागरिकांचे हाल झाले. सुमारे चार किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. अनेकजण सुमारे तासभर एकाच ठिकाणी अडकून आहेत.