नेपाळमधील चितवन परिसरात भूस्खलनानंतर दोन बस त्रिशूली नदीत वाहून गेल्याने सात भारतीय नागरिकांसह किमान ६५ लोक बेपत्ता असल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे. मीडिया रिपोर्ट्सचा हवाला देत वृत्तसंस्थेने म्हटले आहे की, काठमांडूहून निघालेली एंजल बस आणि गौरकडे जाणारी गणपती डिलक्स बसचा शुक्रवारी पहाटे ३.३० च्या सुमारास अपघात झाला. नारायणघाट-मुगलिंग रस्त्यालगत सिमलताल परिसरात दरड कोसळल्याने प्रवाशांसह दोन्ही बस नदीत वाहून गेल्या.

मायरिपब्लिका न्यूज पोर्टलने दिलेल्या माहितीनुसार, बेपत्ता प्रवाशांमध्ये सात भारतीय नागरिकांचा समावेश आहे.

हेही वाचा – पुणेकरांनी हद्दच केली राव! “गुपचूप बस तिथं” म्हणत थेट बिबट्यालाच दरडावले, महावितरण कार्यालयातील Video Viral

एंजेल बसमध्ये २४ तर गणपती डिलक्समध्ये ४१ जण होते, असे पोलिसांनी सांगितले. गौरकडे जाणाऱ्या बसमधील तीन प्रवासी वाहनातून उडी मारून पळून जाण्यात यशस्वी झाले, असे अहवालात म्हटले आहे.

चितवनचे मुख्य जिल्हा अधिकारी इंद्रदेव यादव यांनी सांगितले की, “बचावकार्य सुरू असून, भूस्खलनाचा ढिगारा हटवला जात आहे. बचावकार्यासाठी पोलीस आणि सशस्त्र दलही सहभागी झाले आहेत.”

हेही वाचा –२०२५ मध्ये युरोपमध्ये येणार मोठे संकट! बाबा वेंगाचे ‘हे’ भाकितं ठरणार का खरे? येत्या वर्षांची भविष्यवाणी ऐकून उडेल थरकाप

नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल ‘प्रचंड’ म्हणाले की, “त्यांनी तातडीने शोध आणि बचाव कार्यासाठी निर्देश जारी केले आहेत. “देशभरात नुकत्याच आलेल्या पूरामुळे मोठ्या प्रमाणात मालमत्तेचा नाश झाला आणि भूस्खलनात प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले हे ऐकून मला खूप वाईट वाटले.

नारायणगड-मुग्लिन मार्गावर भूस्खलनात बस वाहून गेल्याच्या दु:खद घटनेने मला खूप वाईट वाटले. मी स्थानिक प्रशासनासह सरकारच्या सर्व एजन्सींना प्रवाशांचा शोध आणि प्रभावीपणे सुटका करण्याचे निर्देश दिले आहे” असे प्रचंड यांनी X वर पोस्ट शेअर करून सांगितले.

हेही वाचा –Video : तब्बल ९ महिने बर्फाखाली अडकलेल्या ३ सैनिकांचे मृतदेह अखेर लष्कराने काढले बाहेर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देशाच्या विविध भागात पूर आणि भूस्खलनामुळे झालेल्या जीवित आणि मालमत्तेच्या हानीबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला. नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.