मुंबई : आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी अटकेत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत केलेली वाढ बेकायदेशीर नसल्याचे आणि अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्यांच्याविरोधात कायद्याने घालून दिलेल्या ६० दिवसांच्या आतच आरोपपत्र दाखल केल्याचे निरीक्षण विशेष न्यायालयाने नोंदवले आहे. आरोपपत्राची दखल घेण्यात न आल्याचा दावा करून देशमुखांनी जामिनाची मागणी केली होती. ती फेटाळताना न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले. 

आरोपपत्र दाखल केल्यानंतर गुन्ह्याची दखल घेणे ही फौजदारी प्रक्रिया संहितेअंतर्गत न्यायिक अधिकार वापरण्यासाठी आवश्यक अट नसल्याचेही न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले आहे.

nashik 60 lakh machinery stolen marathi news
यंत्रसामग्री चोरीचा गुन्हा दाखल होण्यासाठी पाच वर्षे फरफट, दिंडोरी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तक्रारदाराचा संशय
mumbai high court, Senior Citizens, Maintenance Act, Misuse in Property Disputes, Tribunal s Role Emphasized, property disputes, property disputes in senior citizens,
मालमत्ता वादात कायद्याचा गैरवापर, उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती
High Court decision, Accused, Seek Bail, Next Day, Authorities, Refuse Prosecution, under MoCCA,
आवश्यक मंजुरी न मिळाल्यास मोक्का लागू नाही, आरोपीला दुसऱ्याच दिवशी जामीन मागण्याचा अधिकार
Like daughter even daughter in law can get job on compassionate basis
मुलीप्रमाणेच सुनेलासुद्धा अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळू शकते…

विशेष न्यायालयाने १८ जानेवारीला देशमुख यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. तो का फेटाळण्यात आला याची कारणमीमांसा करणारा तपशीलवार आदेश शुक्रवारी उपलब्ध झाला. देशमुख यांना २ नोव्हेंबरला ईडीने अटक केली होती व सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्राची आपल्याला न्यायालयीन कोठडी सुनावताना विशेष न्यायालयाने दखल घेतलेली नाही, असा दावा देशमुख यांनी केला होता. तर आरोपपत्राची विशेष न्यायालयाने दखल घेतली नसल्याचा आधार घेऊन देशमुख जामिनाची मागणी करू शकत नाहीत, असा दावा करून ईडीने त्यांच्या जामिनाला विरोध केला होता.