वसई- पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांच्यावर ५ कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा सांगितला आहे. ठाकूर यांनी चव्हाण यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या खंडणी वसुलीचे आरोप केले आहेत.

हेही वाचा – “पंतप्रधान हा देशाचा, मोदींनी भाजपाचा प्रचार करू नये”, उद्धव ठाकरे यांचा मोदी आणि शाहांवर घणाघात

cost of inauguration ceremony of Metro should be taken from honorarium of cm and Deputy cm says MLA Ravindra Dhangekar
मेट्रोच्या उदघाटन सोहळ्याचा खर्च मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या मानधनामधून घेतला पाहिजे : आमदार रवींद्र धंगेकर
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Inauguration of sculpture of Mahatma Phule and Savitribai Phule in Nashik
नाशिकमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज विविध कार्यक्रम
Nitin Gadkari Inauguration ceremony of development works held at Karvenagar Attendance of BJP workers is low
गर्दी जमविण्यासाठी भाजप ‘दक्ष’; गडकरींच्या सभेला अल्प उपस्थितीनंतर पदाधिकाऱ्यांना जाग
Former MP Rajan Vikhare criticizes Chief Minister Eknath Shinde
लाज असेल तर माफी मागा, माजी खासदार राजन विचारे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका
niti aayog s recommendations to make free central government land
जमिनी मोकळ्या करा!केंद्र सरकारी भूखंडांबाबत नीती आयोगाची शिफारस, सात वर्षांत ११ लाख कोटींच्या गुंतवणुकीचे आव्हान
leaders pay tributes for Sitaram Yechury
Sitaram Yechurys Death : ‘डाव्या पक्षांचा आवाज हरपला’
jayant patil secret explosion on bhagyashree atrams entry in sharad pawar ncp
गडचिरोली : “राष्ट्रवादीतील फुटीनंतर भाग्यश्री आत्राम शरद पवारांच्या संपर्कात,”जयंत पाटील यांचा गौप्यस्फोट

हेही वाचा – पालघर जिल्ह्यातून १०० कोटींची वसुली, आमदार ठाकूरांचा पालकमंत्री रवींद्र चव्हाणांवर आरोप

पालघर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांनी थेट पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावरच हल्ला चढविला होता. चव्हाण यांच्यावर जिल्ह्यातून १०० कोटी रुपये वसुलीची जबाबदारी असून ते महामार्गावरील हॉटेलमध्ये अधिकारी आणि ठेकेदारांच्या बैठका घेत असल्याचा आरोप ठाकूर यांनी केला होता. त्यामुळे पालकमंत्री रवींद्र चव्हाण चांगलेच संतप्त झाले आहेत. त्यांनी हे आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगितले होते. मी निवडणूक प्रचाराच्या अनुषंगाने बैठका घेतल्या होत्या. पैसे मागितल्याचे आरोप सिद्ध करावे अथवा माफी मागावी असे प्रतिआव्हान दिले होते. मात्र हितेंद्र ठाकूर आपल्या दाव्यावर ठाम आहेत. त्यामुळे रवींद्र चव्हाण यांनी शुक्रवारी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्यावर ५ कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे. ॲड प्रदीप पांडे यांच्या वतीने ही नोटीस पाठविण्यात आली आहे. या नोटिशीला आता ठाकूर काय उत्तर देतात त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.