scorecardresearch

Premium

भाईंदर खाडी पुलाला मिठागर, कांदळवनाच्या जागेचा अडसर; खर्चातही वाढ होण्याची शक्यता

या पुलासाठी मोठय़ा प्रमाणात कांदळवनाची जागा जाणार आहे. ती जागा वनविभागाच्या अखत्यारीत आहे.

bhayander vasai creek bridge project on hold waiting permission from forest dept
भाईंदर रेल्वे पूल (संग्रहित छायाचित्र)

सुहास बिऱ्हाडे, लोकसत्ता

वसई– भाईंदर खाडीवरील प्रस्तावित पुलासाठी मिठागरांच्या तसेच कांदळवनाच्या जागेचा अडथळा अद्याप कायम आहे. पुलासाठी वनविभागाला जागा हस्तांतरित झालेली नसून कांदळवनाच्या जागेवरील मीठ उत्पादकांच्या दाव्यामुळे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे भाईंदर पुलाचे स्वप्न प्रत्यक्षात अवतरण्यासाठी आणखी काही वर्षांचा विलंब लागणार आहे.

gst collection
भरड धान्याशी निगडित उत्पादनांवरील जीएसटी ५ टक्क्यांवर
navi mumbai water supply, navi mumbai municipal corporation no control on water distribution, water intake from morbe dam
नवी मुंबई : मोरबे धरणातून पाण्याचा वारेमाप उपसा अन् मनमानी वितरणामुळे पालिकेचे जल नियोजन विस्कळीत
maharera issued notices to 5 thousand housing projects
पाच हजार गृहप्रकल्पांवर बडगा; महारेराच्या विकासकांना नोटिसा; नोंदणी रद्द होण्याची शक्यता
inflow fenugreek decreased APMC fifty rupees one judi fenugreek retail market
बाजारात मेथीची जुडी खातेय भाव! किरकोळीत एक जुडी पन्नाशीवर

हेही वाचा >>> नालासोपार्‍यातून १३ वर्षीय बेपत्ता मुलीचा मृतदेह खाडीत आढळला

वसई आणि भाईंदरला जोडणाऱ्या भाईंदर खाडीवर एमएमआरडीएतर्फे पूल बांधण्यात येणार आहे. या पुलाच्या कामाला २०१३ मध्ये मंजुरी मिळूनही विविध परवानग्याअभावी पुलाचे काम सुरू झालेले नाही. आतापर्यंत या पुलासाठी महाराष्ट्र सागरी मंडळ (एमबीबी), भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरण (आयडब्ल्यूएआय) आणि महाराष्ट्र सागरी नियंत्रण क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण (एमसीझेडएमए) यांच्या परवानग्या मिळाल्या आहेत. परंतु वनविभाग आणि मिठागर विभागाची परवानगी मिळाली नसल्याने काम रखडले आहे.

हेही वाचा >>> वसई विरार मध्ये पाच दिवसांच्या गणपतीला भक्तीमय वातावरणात निरोप

या पुलासाठी मोठय़ा प्रमाणात कांदळवनाची जागा जाणार आहे. ती जागा वनविभागाच्या अखत्यारीत आहे. या जागेच्या मोबदल्यात वनविभागाला डहाणू तालुक्यातील वाडापोखरण ४.४४ हेक्टर जागा देण्यात येणार आहे. या जागेच्या हस्तांतरणाचा प्रस्ताव अद्याप विभागीय आयुक्तांकडून शासनाला सादर करण्यात आलेला नाही. वनखात्याप्रमाणे पुलासाठी मिठागराची जागा जाणार आहे. ही जागा मीठ उत्पादकांना भाडेपट्टीवर देण्यात आली होती. त्या उत्पादकांना जागेचा मोबदला द्यावा लागणार आहे. मात्र या ठिकाणी ११९ मीठ उत्पादक असून त्यांच्यात या निधीवरून वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे एमएमआरडीएला २८ कोटींचा निधी मंजूर करता येत नाही.

आणखी निधी आवश्यक

नवघर माणिकपूर नगर परिषद असताना या पुलाचा पाठविण्यात आला होता. तेव्हा पुलाचा खर्च ३०० कोटी होता. २०१८ पर्यंत तो अकराशे कोटींवर पोहोचला होता. २०१३ मध्ये एमएमआरडीएने या पुलाच्या कामाला मंजुरी दिली होती तेव्हा खर्च १५०० कोटींवर पोहोचला होता. आता खर्च १५०० कोटींवर आहे. अडथळय़ांमुळे  खर्चातही वाढ होणार असल्याची माहिती माजी महापौर नारायण मानकर यांनी सांगितले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bhayander vasai creek bridge project on hold waiting permission from forest dept zws

First published on: 25-09-2023 at 05:16 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×