सुहास बिऱ्हाडे, लोकसत्ता

वसई– भाईंदर खाडीवरील प्रस्तावित पुलासाठी मिठागरांच्या तसेच कांदळवनाच्या जागेचा अडथळा अद्याप कायम आहे. पुलासाठी वनविभागाला जागा हस्तांतरित झालेली नसून कांदळवनाच्या जागेवरील मीठ उत्पादकांच्या दाव्यामुळे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे भाईंदर पुलाचे स्वप्न प्रत्यक्षात अवतरण्यासाठी आणखी काही वर्षांचा विलंब लागणार आहे.

Tuljapur Temple Vikas Arakhada loksatta news
२१०० कोटींचा तुळजाभवानी तीर्थक्षेत्र विकास आराखडा मान्यतेसाठी मुख्यमंत्र्यांकडे सादर, आमदार पाटील यांची माहिती
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
cr start work of widening the pedestrian bridge at Diva railway station
दिवा रेल्वे पादचारी पुलावरील गर्दीचा ताण कमी होणार! ;मध्य रेल्वेकडून पुलाच्या रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात
mmrda planning to build a creek bridge from kasarvadavali to kharbav in bhiwandi
ठाणे आणि भिवंडी शहरातील अंतर कमी होणार; कासारवडवली ते खारबाव खाडीपुलासह जोडरस्ता प्रकल्पाची आखणी
Construction of 210-meter-long bridge on Bullet Train route on National Highway 48 in Gujarat completed
बुलेट ट्रेन मार्गावरील २१० मीटर लांबीच्या पुलाचे बांधकाम पूर्ण
Badlapur, chemical sewage channel, underground sewerage scheme, old channel, sewage Badlapur, l
बदलापूर : रासायनिक सांडपाणी वाहिनीचा प्रश्न सुटणार! १२८ कोटींच्या भुयारी गटार योजनेला सुरुवात, जुनी वाहिनी बदलणार
Wardha River , Chandrapur , Maurya,
वर्धा नदीच्या काठावर मौर्यकालीन अवशेष…
Both tunnels in Kashedi Ghat on Mumbai-Goa highway will be opened soon
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील दोन्ही बोगदे लवकरच सुरु होणार

हेही वाचा >>> नालासोपार्‍यातून १३ वर्षीय बेपत्ता मुलीचा मृतदेह खाडीत आढळला

वसई आणि भाईंदरला जोडणाऱ्या भाईंदर खाडीवर एमएमआरडीएतर्फे पूल बांधण्यात येणार आहे. या पुलाच्या कामाला २०१३ मध्ये मंजुरी मिळूनही विविध परवानग्याअभावी पुलाचे काम सुरू झालेले नाही. आतापर्यंत या पुलासाठी महाराष्ट्र सागरी मंडळ (एमबीबी), भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरण (आयडब्ल्यूएआय) आणि महाराष्ट्र सागरी नियंत्रण क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण (एमसीझेडएमए) यांच्या परवानग्या मिळाल्या आहेत. परंतु वनविभाग आणि मिठागर विभागाची परवानगी मिळाली नसल्याने काम रखडले आहे.

हेही वाचा >>> वसई विरार मध्ये पाच दिवसांच्या गणपतीला भक्तीमय वातावरणात निरोप

या पुलासाठी मोठय़ा प्रमाणात कांदळवनाची जागा जाणार आहे. ती जागा वनविभागाच्या अखत्यारीत आहे. या जागेच्या मोबदल्यात वनविभागाला डहाणू तालुक्यातील वाडापोखरण ४.४४ हेक्टर जागा देण्यात येणार आहे. या जागेच्या हस्तांतरणाचा प्रस्ताव अद्याप विभागीय आयुक्तांकडून शासनाला सादर करण्यात आलेला नाही. वनखात्याप्रमाणे पुलासाठी मिठागराची जागा जाणार आहे. ही जागा मीठ उत्पादकांना भाडेपट्टीवर देण्यात आली होती. त्या उत्पादकांना जागेचा मोबदला द्यावा लागणार आहे. मात्र या ठिकाणी ११९ मीठ उत्पादक असून त्यांच्यात या निधीवरून वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे एमएमआरडीएला २८ कोटींचा निधी मंजूर करता येत नाही.

आणखी निधी आवश्यक

नवघर माणिकपूर नगर परिषद असताना या पुलाचा पाठविण्यात आला होता. तेव्हा पुलाचा खर्च ३०० कोटी होता. २०१८ पर्यंत तो अकराशे कोटींवर पोहोचला होता. २०१३ मध्ये एमएमआरडीएने या पुलाच्या कामाला मंजुरी दिली होती तेव्हा खर्च १५०० कोटींवर पोहोचला होता. आता खर्च १५०० कोटींवर आहे. अडथळय़ांमुळे  खर्चातही वाढ होणार असल्याची माहिती माजी महापौर नारायण मानकर यांनी सांगितले.

Story img Loader