वसईतील दैनंदिन कामकाजांवर परिणाम, सरकारी कार्यालयांत शुकशुकाट

शासकीय कार्यालयातील कामकाज ठप्प झाले आहे. शाळा आणि आरोग्य यंत्रणेवरही संपाचा परिणाम झाला आहे.

government office 1

वसई :  राष्ट्रीय पेन्शन स्कीम (एनपीएस) रद्द करुन जुनी पेन्शन योजना (ओपीएस) लागू करावी, अशी मागणी करीत मंगळवारी वसईतील विविध विभागातील मोठय़ा संख्येने शासकीय कर्मचारी या संपात सहभागी झाले होते याचा परिणाम दैनंदिन कामकाजावर झाला असल्याचे चित्र दिसून आले.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

प्रामुख्याने जुनी पेन्शन योजना लागू करणे व मा बक्षी समितीने खंड २ च्या माध्यमातून जिल्हा परिषद कर्मचारी यांच्या वेतन त्रुटी दूर केल्या नाहीत याबाबत फेर विचार करणे यासह इतर मागण्यासाठी वसई तालुक्यातील शासकीय कर्मचारम्य़ांनी संप पुकारला आहे. त्यामुळे शासकीय कार्यालयातील कामकाज ठप्प झाले आहे. शाळा आणि आरोग्य यंत्रणेवरही संपाचा परिणाम झाला आहे. वसईतील पंचायत समिती, तहसिल दार विभाग कर्मचारी, शिक्षण अशा विभागातील कर्मचारी यात सहभागी झाले होते. शासनाने मागण्या मान्य कराव्यात या मागणी साठी वसई तहसिलदार कार्यालय,पंचायत समिती कार्यालय अशा ठिकाणी एकत्रित येत निदर्शने करण्यात आली. ‘ एकच मिशन, जुनी पेन्शन अशी घोषणा बाजी केली.

गेल्या अनेक वर्षांंपासून आम्ही कर्मचारी या सेवेत कार्यरत आहोत. शासनाने आमच्या मागणीचा विचार करावा. केवळ आश्वसन नको तर निर्णय घ्यावा अशी मागणी संपात सहभागी झालेल्या कर्मचारम्य़ांनी केली आहे. मोठय़ा संख्येने कर्मचारी यात सहभागी झाले असल्याने सर्वच ठिकाणच्या शासकीय कार्यालयात शुकशुकाट पहायला मिळाला. कामकाज ठप्प झाले असून कर्मचारी संघटना आRमक झाल्याचे चित्र दिसून आले. तर कामासाठी आलेल्या नागरिकांना ही संपामुळे रिकाम्या हाताने माघारी परतावे लागले.

मराठीतील सर्व वसई विरार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-03-2023 at 01:14 IST
Next Story
मीरा-भाईंदर पालिकेचा दोन हजार कोटींचा अर्थसंकल्प; करवाढ नसल्याने नागरिकांना दिलासा
Exit mobile version