वसई : वसई विरार महापालिकेचे माजी महापौर रुपेश जाधव यांना सक्तवसुली संचलनालयाने ७८० कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्याप्रकऱणी एक नोटीस बजावली असून ती सध्या सोशल मिडियावर वायरल झाली आहे. मात्र ही नोटीसच बनवाट असून मला किंवा माझ्या कंपनीला कुठलीच नोटीस आली नसल्याता दावा रुपेश जाधव यांनी केला आहे. या बनवाट नोटीस प्रसारीत केल्याबद्दल पोलिसात तक्रार दाखल करणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.

रुपेश जाधव हे वसई विरार महापालिकेचे माजी महापौर आहे. त्यांची गणेश वेंचर नावाची कंपनी आहे. या कंपनीचे संचालक रुपेश जाधव, मनोज चतुर्वेदी,गंगाराम मुकुंद आणि अनिश गीध या चौघांना सक्तवसुली संचलनालयाने आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी नोटीस बजावली असून या नोटीसटी प्रतच समाज माध्यमावर वायरल झाली आहे.. ७८० कोटींचा मनी लॉंड्रीग प्रकरणात ही नोटीस पाठविण्यात आल्याचे सांगण्यात येते. चौकशीसाठी नवी दिल्ली येथे १५ दिवसात हजर राहण्याचे आदेश दिल्याचे या नोटीस मध्ये म्हटले आहे.

Accident in up mirzapur
Accident in UP : मजुरांना घेऊन जाणाऱ्या ट्रॉलीला ट्रकची धडक; १० जणांचा जागीच मृत्यू, मोदींनी व्यक्त केला शोक
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
fake income tax officer raigad
रायगड, रोह्यात तोतया आयकर अधिकाऱ्यांना बेड्या…जाणून घ्या काय आहे प्रकरण…
In Thane two people were cheated by saying they would get more returns if they invested in stock market
ठाणे : शेअर बाजारातील गुतंवणूकीच्या माध्यमातून दोघांची लाखो रुपयांना फसवणूक
sanjay raut granted bail hours after being convicted in medha somaiya defamation case
Medha Somaiya Defamation Case : संजय राऊत यांना न्यायालयाचा अंशत: दिलासा, 30 दिवसांसाठी….
Dhananjay Chandrachud
D Y Chandrachud : “…तर मी तुम्हाला हाकलून देईन”, सरन्यायाधीशांनी ममता बॅनर्जींच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या याचिकाकर्त्याला सुनावलं
Fake officers robbed businessman by fear of arrest five arrested by Khar police
तोतया अधिकाऱ्यांनी अटकेची भीती दाखवून लुटले, खार पोलिसांकडून पाच जणांना अटक
SEZ company objected to decision to return land purchased by farmers
उरण : जमिनी शेतकऱ्यांना परत करण्यास सेझ कंपनीची हरकत,पुढील सुनावणी ९ ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली

हेही वाचा : वसई विरार महापालिकेतून २९ गावे वगळण्याचे प्रकरण, आज उच्च न्यायालयात सुनावणी, निर्णय अपेक्षित

मात्र रुपेश जाधव यांनी ही नोटीसच बनावट असल्याचे म्हटले आहे. मला किंवा माझ्या सहकार्‍यांना कुठलीच नोटीस आलेली नाही. ज्या तक्रारदाराशी आमचा वाद आहे त्याने ही बनावट नोटीस तयार केली आहे. या प्रकरणी बदनामी केल्याबद्दल तसेच सक्तवसुली संचलनालयाची बनावट कागदपत्रे तयार केल्याबद्दल मी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार आहे, असेही त्यांनी सांगितले.