भाईंदर : मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या आरक्षित जमिनीवरील झोपडपट्टीचे अतिक्रमण दूर करण्याच्या  प्रशासनाच्या कारवाईला खुद राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विरोध दर्शवला आहे. यामुळे झोपडपट्टीधारकांना दिलासा मिळाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महानगरपालिकेच्या नावे सातबारा झालेल्या काशिमीरा येथील आरक्षण क्रमांक ३६४  जागेवरील झोपडपट्टीचे अतिक्रमण मोकळे करण्याची मोहीम पालिकेने हाती घेतली आहे. त्यानुसार सुमारे तीनशेहून अधिक झोपडपट्टीवर तीन महिन्यांपूर्वी पालिकेने अतिक्रमण विरोधी कारवाईदेखील केली होती, मात्र ही कारवाई बेकायदा असून पालिका प्रशासन विकासकाच्या हितासाठी हे काम करत असल्याची तक्रार झोपडपट्टीधारकांनी केली आहे. शिवाय पर्यायी जागा मिळत नाही तोपर्यंत ही जागा सोडण्यास नकार दिल्याने वाद सुरू आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jitendra awhad opposed mbmc action to remove the encroachment of slums zws
First published on: 28-01-2022 at 01:16 IST