विरार : पेल्हार पोलिसांनी बेकायदा वास्तव्य करणाऱ्या नऊ बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. यात सात महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. बांग्लादेशातून नदी पार करून हे आरोपी भारतात आले होते. अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला करणारा आरोपी बांग्लादेशी घुसखोर असल्याचे तपासात समोर आले आहे. यानंतर पोलिसांनी शहरात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणार्‍या बांग्लादेशी नागरिकांविरोधात शोधमोहिम हाती घेतली आहे.

नालासोपाऱ्याच्या धानीवबाग परिसरात बेकायदेशीरपणे बांगलादेशी नागरिक वास्तव्य करत असल्याची माहिती पेल्हार पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार अनिल शेगर यांना मिळाली होती. त्यानुसार धानीवबाग येथे जाऊन पाहाणी केली असता त्यांच्याकडे कोणतेही कागदपत्र नसल्याचे आढळून आले. ते गेल्या अनेक वर्षांपासून नालासोपार्‍यात रहात होते. त्यांच्यावर पेल्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. 

बांग्लादेशी नागरिक असल्याची माहिती मिळाल्यानंतर पेल्हार पोलिसांनी धानिवबाग येथे शोध मोहिम राबिण्यात आली होती. त्यांच्याकडे कुठलेही कागदपत्रे नव्हते. त्यांनी छुप्या मार्गाने प्रवेश केला होता, अशी माहिती पोलीस उपायुक्त जयंत बजबळे यांनी दिली. या आरोपींचे अनेक बांग्लादेशी नागरिक येथे वास्तव्य करत असल्याची शक्यता असून त्यांचा शोध सुरू असल्याचेही उपायुक्त बजबळे यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

असा केला भारतात प्रवेश

बांग्दालेश मध्ये असलेली गरीबी आणि उपासमारीमुळे आपण भारतात रोजगारासाठी आल्याचे या नागरिकांनी सांगितले. भारताच्या सरगद्दीवरील गस्तीपथकांची नजर चुकवून इसामोती नदी पार करून ते पश्चिम बंगाल येथील  २४ परगणा जिल्ह्यातील हकिमपूर गावात पोहोचले. तेथून हावडा मार्गे रेल्वेने प्रवास करून मुंबईत आणि नालासोपार्‍यात आले होते अशी माहिती पोलिसांनी दिली. हे नागरिक ईमो ॲपवरून बांग्लादेशातील आपल्या नातेवाईकांशी संपर्क करत होते. ही कारवाई परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त जयंत बजबळे, सहाय्यक पोलीस आयुक्त बजरंग देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी, पोलीस निरीक्षक दुर्गा चौधरी (गुन्हे) सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन पवार, पोलीस उपनिरीक्षक तुकाराम भोपळे आदींच्या पथकाने ही कारवाई केलील