प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढल्याकडे पालिकेचे दुर्लक्ष

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विरार : वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात प्लास्टिक पिशव्यांचा वापर सर्रास सुरू आहे. पालिकेकडून याविरोधात होणारी कारवाई मंदावली असल्याने वसईत पुन्हा प्लास्टिकचा विळखा वाढत चालला आहे. पालिकेने एप्रिल २०२१ ते डिसेंबर २०२१ कालावधीत केवळ ८०३ किलो प्लास्टिक जप्त केले तर केवळ २ लाख एक हजार रुपये दंडवसुली केली आहे. राज्य शासनाने २०१८ मध्ये संपूर्ण शहरात प्लास्टिकवर बंदी आणली होती. त्यानंतर पालिकेने कडक कारवाई करत नागरिकांना कागदी कापडी पिशव्यांची सवय लागली होती; पण करोनाकाळात ही कारवाई थांबली असल्याने पुन्हा शहरात प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढला आहे. करोनानंतर अनेकांचे रोजगार गेल्याने त्यांनी रस्त्यावरील छोटे-मोठे धंदे सुरू केले. यामुळे शहरातील फेरीवाल्यांची संख्या झपाटय़ाने वाढली आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Plastic seized municipality during year ysh
First published on: 01-02-2022 at 00:02 IST