वसई : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर प्रदूषण पसरवणाऱ्या १७ सिमेंट कारखान्यांना प्रदूषण नियंत्रक मंडळाने एक आठवडय़ाची कारणे दाखवा नोटीस बजावण्यास सुरुवात केली आहे. खासदार राजेंद्र गावित यांनी अचानक या कंपन्यांना भेटी दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या कंपन्यांकडून पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन होत असून सिमेंटनिर्मितीत उडणाऱ्या धुरळय़ामुळे हवा प्रदूषित होत असून महामार्गावरील वनराईही धोक्यात आली आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मोठय़ा प्रमाणावर सिमेंट तयार करणाऱ्या कंपन्या आहेत. या कंपन्यांमध्ये दररोज अवजड वाहने, मिक्सर तसेच वाळूची वाहने ये-जा करत असतात. मात्र या कंपन्या कुठल्याही प्रकारचे पर्यावरणाचे नियम पाळत नसल्याने तसेच प्रदूषण रोखण्याची कोणतीच यंत्रणा नसल्याने या कंपन्यांमधून सतत धूळ, मातीचे प्रदूषण होत असते. मातीचे प्रमाण एवढे भयंकर असते की महामार्ग धुळीने भरलेला दिसतो. या धुळीमुळे महामार्गावरून जाणाऱ्या वाहनचालक तसेच परिसरातील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pollution board issue notice to 17 cement companies in mumbai ahmedabad highway area over air pollution zws
First published on: 30-12-2022 at 06:20 IST