वसईत आधुनिक तंत्रज्ञान वापरूनही पावसाचे पाणी जमिनीत मुरलेच नाही

वसई :  शहरात साचणारे पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्याचा पालिकेचा प्रयोग अयशस्वी ठरला आहे. पालिकेने शहरातील चार ठिकाणी आधुनिक तंत्रत्रान वापरून हा प्रयोग सुरू केला होता. मात्र पाण्याचा जमिनीत निचरा झालाच नाही आणि प्रयोग फसला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसई-विरार शहरात दरवर्षी पावसाळ्यात पूरपरिस्थिती निर्माण होऊन शहर जलमय होण्याची समस्या निर्माण होत असते. नियोजनाअभावी वाढत असलेल्या शहरीकरणामुळे शहराच्या अनेक सखल भागात पाणी साठत असते. या पूर परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी नेमलेल्या राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या (निरी) समितीने शहरातील पाणी साठण्याच्या ३० जागा शोधून काढल्या होत्या. दाटीवाटीने असलेल्या इमारती आणि पाणी जाण्याचे मार्ग बंद झालेल्या या भागात दरवर्षी पावसाळ्यात पाणी साठत असते. ही समस्या सोडविण्यासाठी धारण तलाव (होल्डिंग पॉण्डस) तयार करावेत, अशा सूचना निरी समितीने सुचविल्या होत्या. मात्र शहरात धारण तलाव करणे शक्य नसल्याने पालिकेने इतर पर्यायांचा विचार सुरू केला होता. त्याचा शोध सुरू असताना पाालिकेने पावसाचे पाणी जमिनीतच साठवून या समस्येवर तोडगा काढण्याचा निर्णय घेतला होता. पाणी या विषयावर काम करणाऱ्या वॉटर फिल्ड रिसर्च फाउंडेशन या संस्थेने नंदुरबार, नाशिक या ठिकाणच्या आश्रमशाळांमध्ये नैसर्गिकरित्या पाणी जमिनीत साठवण्याचा प्रयोग यशस्वीरित्या केला होता. त्याचाच  आधार घेऊन पावसात शहरात साचलेले पाणी जमिनीतच मुरवले तर पूराच्या पाण्याची समस्या नष्ट होईल आणि जमिनीची भूजल पातळी वाढू शकेल असा पालिकेचा प्रयत्न होता. हा दुहेरी फायदा लक्षात घेऊन पालिकेने संस्थेच्या वॉटरफिल्ड टेक्नॉलॉजी या कंपनीला हे काम दिले होते. त्यांनी नालासोपारा पुर्वेच्या तुळींज येथे प्रायोगिक तत्वावर हा प्रकल्प हाती घेतला होता.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water drain experiment failed vasai ssh
First published on: 06-08-2021 at 01:04 IST