दोन दशकांपासून पाण्याची प्रतीक्षा;जमिनीत खड्डे खणून तहान भागवण्याची वेळ

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विरार : वसई-विरार ग्रामीण भागातील ६९ गावांच्या प्राण्याचा प्रश्न अजूनही सुटला नाही. पालिका पाणी देणार या आशेवर ही गावे मागील दोन दशकापासून पाण्याची वाट पाहत आहेत. या प्रकल्पाला पालिकेकडून पाणीपुरवठा देण्यासाठी हिरवा कंदील न मिळाल्याने जलवाहिन्या चाचणीचे काम घेता येत नसल्याने अजूनही ही गावे जमिनीत खड्डे खणून आपली तहान भागवत आहेत. वसई पूर्व पट्टीत असलेल्या ६९ गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी शासनाकडून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून योजना राबवून या गावांचा पाणी प्रश्न मार्गी लावण्यात येणार होता. या योजनेंतर्गत ६९ गांवात जलवाहिन्या जाळे उभारण्यात आले असून ६९ गावात जलकुंभसुद्धा उभारले असल्याची  माहिती प्राधिकरणाकडून देण्यात आली आहे. पण अनेक वर्षांचा काळ लोटला पण या जलकुंभात पाणी आलेच नाही. आता काम पूर्ण झाले असता पालिकेत समावेश असलेल्या केवळ ५२ गावांना पालिका हे पाणी देणार असल्याचे सांगत इतर गावांचा भार जिल्हापरिषद आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी सोसावा असे पालिकेने सांगितले. त्यातही ५२ गावांना पालिकेने अजूनही पाणी दिले नाही.    

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water problem persists villages rural area ysh
First published on: 15-02-2022 at 00:22 IST