भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी दिवे घाटात जखमी झालेल्या वारकऱ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या दोन्ही मृतांच्या कुटुंबांना भाजपाच्या आपदा ट्रस्टमधून पाच लाखांची मदत दिली जाणार असल्याची घोषणा केली. तसंच आपलं सरकार आल्यानंतर दिंड्यांना पोलीस संरक्षण देऊ असं म्हटलं आहे.