आद्य क्रांतीकारक उमाजी नाईक हे छत्रपती शिवाजी महाराजांना प्रेरणास्थान मानत. देशावर परकियांना राज्य करु देणार नाही अशी ठाम भूमिका उमाजी नाईक यांनी घेतली होती. ब्रिटिशांविरोधात त्यांनी आपला लढा सुरु केला होता. फंदफितुरीमुळे उमाजी नाईक पकडले गेले. पुण्यातील शुक्रवार पेठ भागात असलेली आत्ताची मामलेदार कचेरी अशी ओळख असलेली व तत्कालीन कचेरीच्या आवारात असलेल्या कारागृहात त्यांना डांबण्यात आलं होतं. ३ फेब्रुवारी १९३२ रोजी त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली.