पंडित नेहरुंच्या नंतर यशवंतराव चव्हाण यांच्याकडे नेतृत्त्व यावं असं देशाला वाटत होतं. मात्र तसं झालं नाही. पाकिस्तानसोबत युद्ध झालं होतं त्यावेळी यशवंतराव चव्हाण संरक्षणमंत्री होते. त्यावेळी लालबहादुर शास्त्री पंतप्रधान झाले होते. ते दोघे ताश्कंदला गेले. त्या रात्रीच ताश्कंदमध्ये शास्त्रींचं निधन झालं. शास्त्री यांचं पार्थिव घेऊन जेव्हा यशवंतराव चव्हाण भारतात परतले तेव्हा सगळा देश शोकाकुल झाला होता. आता शास्त्रीनंतर देशाचं नेतृत्त्व यशवंतराव चव्हाण यांनी करावं असं त्यावेळच्या सगळ्या प्रमुख नेत्यांना वाटत होतं. काँग्रेसशासित राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीही यशवंतराव चव्हाण यांच्याच नावाला पाठिंबा दर्शवला होता. मात्र नेमकं असं काय घडलं की ते पंतप्रधान होऊ शकले नाहीत हे सांगितलं आहे शरद पवार यांनी. साठीचा गझल महाराष्ट्राच्या या लोकसत्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात शरद पवार सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांना दिलखुलास उत्तरं दिली.