राज्यभरात झालेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर भागातील झेंडू उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. नवरात्रीच्या तोंडावर झेंडू उत्पादक शेतकरी झेंडूचे उत्पादन घेऊन त्यातून काही पैसे मिळविण्याची आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, पावसानं झेंडू मातीमोल झाला असून, शेतकऱ्यांच्या आशेवर पावसानं पाणी फेरलं आहे.