Sanjay Raut: ‘महाराष्ट्रातील प्रत्येक मंत्रालयात भ्रष्टाचार आहे’; राऊतांचा राज्यसरकारवर गंभीर आरोप
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र आणि महाराष्ट्र सरकार जोरदार टीकास्र सोडलं आहे. देशातील महागाई, बेरोजगारी आणि कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न गंभीर आहेत. या प्रश्नांवरून लोकांचं लक्ष हटवण्यासाठी भाजपाकडून दंगली पेटवण्याचं काम सुरू आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला. दरम्यान, त्यांनी केंद्र आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक मंत्रालयात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केला आहे. मुंबई येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राऊतांनी हा आरोप केला.