गंगापूर तालुक्यातील भिवधानोरा येथील विद्यार्थ्यांना त्यांचा जीव मुठीत घेऊन शाळेत जावे लागत आहे. जायकवाडीच्या एक कि. मीटर बॅकवॉटरमध्ये सडलेल्या थर्माकोलवर बसून विद्यार्थ्यांना हा जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. यावेळी थर्माकोलवर अनेक वेळा साप चढतात, असं विद्यार्थी सांगतात. शाळेत जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे विद्यार्थ्यांना ही तारेवरची कसरत करावी लागत आहे. नदीपात्रातून बाहेर पडताना नदीपात्राच्या परिसरामध्ये असलेल्या गावातून त्यांना वाट काढावी लागते. याप्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी गंगापूर येथील तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते परंतु अद्यापही अहवाल दिला नसल्याची माहिती समोर आली आहे.