‘इंडिया’ या विरोधकांच्या पक्षांची बैठक काल आणि आज म्हणजेच गुरुवारी (३१ऑगस्ट) आणि शुक्रवारी (१ सप्टेंबर)ला पार पडते आहे. या बैठकीसाठी २८ पक्ष एकत्र आले आहेत. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, “इंडिया आघाडीच्या लोगो वर दोन दिवस चर्चा करणार असून लोगोचं अनावरण पुढे ढकललं आहे. देश तर एकच आहे, याबद्दल कुणाच्या मनात शंका आहे का? एक देश, एक निवडणूक ठीक आहे, पण त्याआधी निवडणुका निष्पक्ष व्हाव्यात. फेअर इलेक्शन ही आमची घोषणा आहे. एक देश-एक निवडणूक नव्हे आम्हाला निष्पक्ष निवडणूका हव्या आहेत. देशात निष्पक्ष निवडणूका होत नाहीयेत”