मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या तीन राज्यात भाजपाने अभूतपूर्व मुसंडी मारली आहे. छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये भाजपाने सत्तांतर घडवून आणले असून मध्य प्रदेशातील दोन दशकाची सत्ता कायम ठेवली आहे. मात्र हा विजय भाजपाचा नसून ईव्हीएमचा जनादेश असल्याची टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधत पुन्हा एकदा ईव्हीएमचा मुद्दा उचलून धरला.