आज बदलत्या परिस्थितीत समाजाला काम करणा-या कार्यकर्त्यांची गरज आहे. निवडणुकीत अनेक माणसे स्पध्रेत उतरतात, पण समाजाची मानसिकता ओळखूनच लोक दिले पाहिजेत. चुकीचे काम करणा-या लोकांना न स्वीकारण्याची समाजाची मानसिकता झाली आहे, असे मत जलसंपदा मंत्री व पालकमंत्री शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केले.
यशवंत शिक्षण संस्था व तर्कतीर्थ लक्ष्मणशात्री जोशी विद्यालयाच्यावतीने आयोजित पुण्याच्या महापौर व शाळेच्या माजी विद्यार्थिनी चंचलाताई कोद्रे व शिंदे यांच्या सत्कार सोहळयात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी यशवंत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जयवंतराव चव्हाण होते.
या वेळी पुणे विभागाचे म्हाडाचे अध्यक्ष अंकुश काकडे, आमदार मकरंद पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अरुणादेवी पिसाळ, सूतगिरणीचे अध्यक्ष शशिकांत पिसाळ, जिल्हा परिषद सदस्य शशिकांत पवार, तहसीलदार सुनील चंदनशिवे, संदीप कोद्रे, पुण्याचे नगरसेवक गोपाळ चिंतल, पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे सदस्य रिवद्र चौधरी, रतनसिंह शिंदे, जयदीप शिंदे, अमित कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिंदे पुढे म्हणाले,की पुणे हे शिक्षणाचे माहेरघर असेल तर वाई ही शिक्षणाची पंढरी आहे. आज शिक्षण संस्थांमध्ये स्पध्रेचे युग आहे. व्यावसायिकता वाढायला लागली आहे. अशा परिस्थितीमध्ये समाजाभिमुख काम करणा-या संस्थांचाच लोक विचार करतील. मुंबईप्रमाणेच पिंपरी चिंचवडचा विकास होतो हे पाहिल्यावरच पुण्याच्या सुज्ञ जनतेने शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पुण्याची सत्ता दिली.
खंडाळयामध्ये होणा-या औद्योगिक विकासामुळे पुणे फारच जवळ येत आहे. या सर्वाची भूक भागविण्यासाठी वाई व पाचगणी ही शिक्षणाची पंढरी म्हणून उभी करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यासाठी आमदार मकरंद पाटील यांनीही विचार मांडला आहे. वाईपासून पाटण तालुक्यापर्यंतचा १७८ कोटींचा पर्यटन प्रकल्प उभारला जात असून त्याचे नियोजन सध्या सुरू आहे. त्यामध्ये अनेक नवीन कल्पनांचा समावेश असेल.
आपली शाळा व गुरुजनांप्रति आदर व्यक्त करत कोद्रे या वेळी म्हणाल्या, की त्यांनी दिलेल्या शिदोरीवरच पुढे जात आहे. माझ्या माहेरच्या एकत्र कुटुंबाच्या संस्कारांमुळे मला समाजाबरोबर राहताना कोणतीही अडचण आली नाही. आजही मी गृहिणीच आहे. राजकारणाचा रंग चढलेला नाही. त्यामुळे पुण्यातून काम करताना समाजाला अपेक्षित असेल असेच काम होईल. पुण्यामध्ये होणा-या अनेक सत्कारांपेक्षा माझ्या माहेरच्या लोकांनी व शाळेने केलेला सत्कार हा मोलाचा वाटतो.’’
अंकुश काकडे म्हणाले, की चंचलाताई कोद्रे यांच्या निवडीमागे त्यांच्या घराण्याची पुण्याई महत्त्वाची आहे. आमदार पाटील म्हणाले, की सामाजिकतेचा वारसा लाभलेल्या जमदाडे व कोद्रे कुटुंबातील कोद्रे यांची राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून महापौरपदी निवड झाली. त्या आपल्या कामाने वाई शहराचा, तालुक्याचा व जिल्हयाचा नावलौकिक वाढवतील. कृष्णेचे पाणी वाया जाणार नाही.
या वेळी शिंदे यांचा सत्कार म्हाडाचे अध्यक्ष काकडे यांच्या हस्ते, तर महापौर कोद्रे यांचा सत्कार शिंदे यांच्या हस्ते मानपत्र, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. तसेच कोद्रे यांचा पत्रकार संघ, वाई तालुक्याच्यावतीने व ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने सत्कार करण्यात आला. अरिवद चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. जयवंतराव चव्हाण, प्रताप यादव, ललित चव्हाण, छाया चव्हाण यांनी स्वागत केले. शिंदे व महापौर कोद्रे यांना देण्यात येणा-या मानपत्राचे जावेद मोकाशी यांनी वाचन केले. जयवंत चव्हाण यांनी अध्यक्षीय भाषण व आभार जयवंतराव चव्हाण यांनी मानले. राजेश भोज यांनी सूत्रसंचालन केले.