ठाणे जिल्ह्य़ातील वाढत्या नागरीकरणासाठी भविष्यकाळातील पाण्याची तरतूद म्हणून प्रस्तावित करण्यात आलेल्या मुरबाड तालुक्यातील काळू धरण प्रकल्पातील काळेबेरे आता एकेक करून बाहेर येऊ लागले आहे. बेकायदेशीरपणे धरणाचे काम सुरू झाल्याविरोधात श्रमिक मुक्ती संघटनेने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्याची दखल घेत १ मार्च २०१२ पासून न्यायालयाने धरणाच्या कामास स्थगिती दिली आहे. यासंदर्भात एमएमआरडीएनेही अलीकडेच उच्च न्यायालयात दाखल केलेल्या शपथपत्रात या वस्तुस्थितीला दुजोरा दिला आहे. तसेच कोकण पाटबंधारे विभागाने एमएमआरडीएला अंधारात ठेवून धरणाच्या कामाचे आदेश दिल्याचेही त्यात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. कोणतीही पूर्वपरवानगी न घेता संबंधित कंत्राटदारास कोकण विकास पाटबंधारे खात्याने कामाचे आदेश दिले. भूसंपादनाचा पत्ता नाही. प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन नाही. पर्यावरण तसेच अन्य विभागाच्या परवानग्या नाहीत. मात्र तरीही एमएमआरडीएने ११० कोटी रुपये दिलेच कसे, हा प्रश्न मात्र अनुत्तरितच राहतो, अशी प्रतिक्रिया याचिकाकर्त्यां अॅड. इंदवी तुळपुळे यांनी व्यक्त केली आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या मुंबईपेक्षा अधिक वेगाने ठाणे जिल्ह्य़ातील शहरांची लोकसंख्या वाढत असली तरी त्यांना पुरेसा पाणीपुरवठा करू शकणाऱ्या जलस्रोतांचा अभाव आहे. सध्या उल्हास नदीवरील बॅरेजपासून शहाडपर्यंतचे विविध जलशुद्धीकरण प्रकल्प, बारवी धरण तसेच मुंबईतील धरणातून काही प्रमाणात पाणी घेऊन ठाणे जिल्ह्य़ातील शहरांची तहान कशीबशी भागवली जाते. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यापासूनच पाणीकपातीला सामोरे जावे लागते. ठाण्यातील शहरी भागासाठी काळू आणि शाई हे धरण प्रकल्प शासनाने हाती घेतले आहेत. हे प्रकल्प मार्गी लावताना दिसलेली प्रशासकीय पातळीवरील तप्तरता पाहता ही धरणे पाण्यासाठी बांधली जात होती की पैशासाठी, असा प्रश्न पडतो.

मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corruption in kalu dam project thane
First published on: 17-12-2014 at 06:44 IST