उच्चशिक्षणासाठी विविध राष्ट्रीयीकृत बँकांनी कर्ज देताना नकारात्मक भूमिका न घेता विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज मंजूर करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी एस. पी. सिंह यांनी दिली.
आíथक शिस्त पाळतानाच सामाजिक जबाबदारीची जाणीव बँकांनी ठेवावी, असे ते म्हणाले. जिल्हास्तरीय बँकर्स समितीच्या बठकीत ते बोलत होते. बठकीस जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी, अजय सावरीकर, अग्रणी बँक व्यवस्थापक पी. पी. जारुंडे उपस्थित होते.                  
शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची आíथक परिस्थिती कमकुवत असल्यामुळे ते उच्चशिक्षण ते घेऊ शकत नाही. विद्यार्थी बँकेकडे शैक्षणिक कर्ज मागणीसाठी जातात, तेव्हा बँका नकारात्मक भूमिका घेतात. त्यांना व्यवस्थित व आपुलकीने कर्जाबाबत माहिती देण्यात यावी. अर्जामध्ये काही किरकोळ त्रुटी असल्यास त्या पूर्ण करून घ्याव्यात, मात्र कर्ज देण्याबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी. जर असे घडले तर शिक्षण पूर्ण करताना बँकेला धन्यवाद दिल्याशिवाय विद्यार्थी राहणार नाहीत, असे जिल्हाधिकारी सिंह या वेळी म्हणाले. राजीव गांधी ग्रामीण निवारा योजनांतर्गत घरकुलांसाठी कर्ज, शहरी स्वयंरोजगार, शहरी महिला, विशेष घटक, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत उद्दिष्ट पूर्ण करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.