टंचाई स्थितीवर मात करण्यास भूजलसाठा वाढविणे आवश्यक असल्याचे सांगत शासकीय-निमशासकीय कार्यालयांनी जलपुनर्भरण करावे, असे आदेश पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिले.
पाटील यांनी चालू महिन्यात दोन्ही बैठकांमध्ये टंचाईबाबत आढावा घेत असताना टंचाई स्थितीत अनेक िवधन विहिरी, विहिरी व इतर पाण्याचे स्रोत कोरडे पडल्याचे आढळून आल्याने भूजल साठा वाढवणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. याचाच भाग म्हणून पावसाचा प्रत्येक थेंब वाया जाऊ न देता त्याचे नियोजनपूर्वक पुनर्भरण (रेन वॉटर हार्वेस्टिंग) करणे आवश्यक आहे. अवैध वृक्षतोड, अति पाणीउपसा व पाण्याचे अयोग्य नियोजन यामुळे टंचाई स्थिती निर्माण झाली. त्यामुळे भविष्यात टंचाईवर मात करण्यास पावसाळा सुरू होण्यापूर्वी जलपुनर्भरण कामाचे नियोजन करून पावसाच्या पाण्याचा अपव्यय होऊ न देता त्याचे पुनर्भरण करण्यासाठी वेळेचे नियोजन करणे व जलपुनर्भरण कार्यक्रम राबवण्याचे आदेश त्यांनी दिले.
जिल्हय़ातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शासकीय-निमशासकीय सार्वजनिक इमारतीच्या छतावरील पुनर्भरणाची व्यवस्था करावी. सर्व इमारतींचे सर्वेक्षण करून त्याचा प्रकल्प अहवाल सादर करावा. कामाचे योग्य नियोजन करावे व पावसाळय़ापूर्वी काम पूर्ण होईल याची दक्षता घ्यावी. यासंबंधी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 23rd May 2013 रोजी प्रकाशित
भूजलसाठा वाढविण्यासाठी जलपुनर्भरण करा – पाटील
टंचाई स्थितीवर मात करण्यास भूजलसाठा वाढविणे आवश्यक असल्याचे सांगत शासकीय-निमशासकीय कार्यालयांनी जलपुनर्भरण करावे, असे आदेश पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिले.
First published on: 23-05-2013 at 01:20 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rainwater harvesting is must to increase water level in ground