महानगरपालिकेच्या ताब्यात जमीन नसताना ते रिंगरोडचे काम करणार कसे, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद कोशिरे यांनी केला आहे. शहर कार्यकारिणीच्या मासिक बैठकीत ते बोलत होते. पालिकेत मनसेची सत्ता आल्यापासून अनागोंदी सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.
पालिका २५० कोटींच्या रिंगरोडचे काम हाती घेणार असल्याबद्दल त्यांनी ही शंका उपस्थित केली. सध्याचे पथदीप काढून त्या ठिकाणी १०० कोटी रुपये खर्चून एलईडी पथदीप बसविण्याची काय गरज, ०.३३ एफएसआय मंजूर नसताना ५५ मीटरची क्रेन कशासाठी, त्यासाठी ३० कोटींचा खर्च जनतेच्या पैशातून का, असे प्रश्न उपस्थित करत कोशिरे यांनी पलिकेत मनसेची सत्ता आल्यापासून अनागोंदी सुरू झाल्याचा आरोप केला.
अर्थपूर्ण व्यवहार करत अनेक चुकीच्या अधिकाऱ्यांना बढती देण्यात आली आहे. याचा जाब लवकरच पक्षातर्फे संबंधितांना विचारला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. नाना महाले यांनी विधानसभा, लोकसभा निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना दक्ष राहण्याचे आवाहन केले. या वेळी महिला अध्यक्ष सुनीता निमसे, उपाध्यक्ष संजय खैरनार, दत्ता पाटील, शंकरराव पिंगळे, आदी उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Jan 2013 रोजी प्रकाशित
महापालिकेत मनसेची अनागोंदी
महानगरपालिकेच्या ताब्यात जमीन नसताना ते रिंगरोडचे काम करणार कसे, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद कोशिरे यांनी केला आहे. शहर कार्यकारिणीच्या मासिक बैठकीत ते बोलत होते. पालिकेत मनसेची सत्ता आल्यापासून अनागोंदी सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.
First published on: 23-01-2013 at 12:01 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unnecessary expenses doing by mns in