डॉ. उल्का नातू गडम

रोजच्या धावपळीत सर्व आघाड्यांवर लढताना कितीही मनात आणलं तरी शांत वाटत नाही. अनेकाग्रतेत एकाग्रता साधनं कठीण होऊन बसतं. अशावेळी वाटतं कुणीतरी अशी एखादी युक्ती सांगावी की, त्रासलेले मन क्षणार्धात थोडं तरी शांत होऊ शकेल. यासाठी योगाचार्य व्यवहारे गुरुजी एक खूप छान कृती शिकवत, ती म्हणजे मुखधौती! एक दीर्घ खोलवर श्वास भरून घ्यायचा व तोंडाने जोरात फुंकर मारत सोडून द्यायचा. थोडक्यात श्वास भरून घेताना भरपूर प्राणीशक्तीचे सेवन करत आहोत. हा विचार मनात आणायचा आणि श्वास सोडताना मी तणावमुक्त होत आहे हा विचार करायचा. क्षणभर का होईना खूप छान वाटतं. मनाला शांतता प्रदान करणारे, आसन केल्या केल्या शांतता जाणवून देणारं एक नितांत सुंदर सोपं आसन म्हणजे शशांकासन.

Nashik heat, Temperature Hits New High, 40 Degrees Celsius, nobody on manmad street market, summer, summer news, summer in nashik, heatwave in nashik, heat wave in manmad, manmad news, nashik news,
नाशिक : उंचावणाऱ्या तापमानाने आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ, मनमाडमधील रस्त्यांवर असलेला शुकशुकाट
Bene Israel Alibaug
विश्लेषण: अलिबागमधील ‘अली’ कोण होता? मुस्लीम की बेने इस्रायली?
Nagpur Central Jail, Notorious Gangster, Chetan Hazare , Assaulted by Inmate, crime news, police,
धक्कादायक! मध्यवर्ती कारागृहात टोळीयुद्ध, टिनाच्या पत्र्याने प्राणघातक हल्ला
heat Caution warning of health department in the background of heat stroke mumbai
तापत्या राजकीय वातावरणात उष्माघाताचा फटका; उष्मघाताच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाचा सावधतेचा इशारा!

हे आसन आपल्याला वज्रासनातून पुढे करायचं आहे. दोन्ही हात वज्रासनात मांड्यांवर ठेवा. आता श्वास घेत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घ्या. दोन्ही कोपरांमध्ये हात सरळ ठेवा. आता श्वास सोडत हात खाली आणा, पाठकणा जमिनीला समांतर आणा. पोट/छाती मांड्यांवर व कपाळ जमिनीला गुडघ्यापुढे टेकलं पाहिजे. पृष्ठभाग/नितंब वर उचलू नका. आता हात कोपरात किंचित दुमडा व दोन्ही तळवे व कोपरे जमिनीवर अतिशय शिथिल ठेवा. साधारण ४ ते ५ श्वास या स्थितीत रहा. नंतर पूर्वस्थितीला या. जमल्यास अधिक आवर्तनं करा. या आसनाच्या सरावाने मासिक पाळीच्या काळातील पोटदुखी कमी होते. शांत वाटते.

‘शश’ म्हणजे ससा व अंक म्हणजे मांडी. चंद्रावरील काळे डाग म्हणजे जणू काही त्याच्या मांडीवर बसलेला ससा आहे अशी भारतीय जनमानसात रुजलेली जुनी कल्पना आहे. चंद्र हा शांततेचं, शीतलतेचं प्रतीक आहे. या आसनाची अंतिम स्थितीदेखील सशाप्रमाणे दिसते. त्याचा लाभही मनःशांती देणारा आहे. म्हणूनच या आसनाला शशांकासन या नावाने संबोधले जाते.