विश्वचषकात भारतीय संघाचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले असल्याने चाहत्यांची निराशा झाली. पण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष जगमोहन दालमिया यांनी मात्र संघाचे कौतुक केले आहे. विश्वचषकात भारतीय संघाची कामगिरी विलक्षण होती, असे त्यांनी म्हटले आहे.
उपांत्य फेरीत भारतीय संघ पराभूत झाला असला तरी त्यांनी सलग सात सामन्यांमध्ये मिळवलेल्या विजयाचे दालमिया यांनी कौतुक केले आहे. याबाबत ते म्हणाले की, ‘‘विश्वचषकात दमदार कामगिरी केल्याबद्दल मी संपूर्ण भारतीय संघाचे अभिनंदन करू इच्छितो. त्यांनी आदर्शवत खेळाचा नजराणा पेश केला, त्यांनी खेळभावना ध्यानात ठेवत कामगिरी केली आणि करोडो चाहत्यांना आनंद दिला.’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व विश्वचषक २०१५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jagmohan dalmiya lauds team indias outstanding world cup performance
First published on: 28-03-2015 at 05:50 IST