मुंबई-नागपूर महामार्गावर  भीषण अपघात घडला आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या एका ट्रकने समोरुन येणाऱ्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये  एक जण जागीच ठार झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. मुंबई- नागपूर महामहामार्गावरील तिसगाव परिसरातील देवगिरी नदीच्या पुलाजवळ हा अपघात घडला. संजय असरूजी सांगळे ( वय ४२ रा. मुंकदवाडी औरंगाबाद ) असं मृत झालेल्या व्यक्तिचे नाव आहे. त्याच्यासोबत गाडीवर आणखीनं दोघेजण होते. या दोघांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.  घाटी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या अपघातमध्ये सत्यभामा सांगळे आणि हरिशचंद्र शिंदे जखमी झाले आहेत.

औरंगाबाद येथून लासुनस्टेशनकडे भरधाव वेगात जाणाऱ्या  ट्रक क्रमांक एमएच- २० व्हीई- ९५०० ने लासूरकडून येणाऱ्या दुचाकी क्र एमएच-२० डीएन-१०९३ धडक दिली. दुचाकीवरील सत्यभामा सांगळे यांना मुका मार लागल्याने त्या बेशुध्द अवस्थेत असून, हरिशचंद्र शिंदे यांच्या  पायाला गंभीर दुखापत झाली आहे.