मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
- घाऊक बदल्यांच्या बडग्याने जिल्हा परिषदेच्या शिक्षकांमध्ये असंतोष
- एलबीटीचा भरणा सुरू; व्यापाऱ्यांमध्ये फूट
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- 'एलबीटी' संदर्भात व्यापा-यांची बैठक
- सीमा तपासणी नाक्यांमुळे राज्याच्या महसूल उत्पन्नात वाढ होणार- मुख्यमंत्री
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
चिंदबरम यांनी सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे केवळ आकड्यांचा गोलमाल असून, आम आदमी त्यामध्ये कुठेच जागा नसल्याची टीका विरोधकांनी सत्ताधारी संयुक्त पुरोगामी आघाडीवर केली. चिदंबरम यांनी गुरुवारी सकाळी पुढील आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला. या अर्थसंकल्पावर विरोधकांनी कडाडून हल्ला चढविला.
महागाई, भाववाढ यामुळे आधीच पिचलेल्या सामान्य माणसासाठी दिलासा देणारे या अर्थसंकल्पात काहीच नसल्याचे विरोधकांनी म्हटले आहे. शेतकऱयांसाठी अर्थसंकल्पात काहीच नाही
चिदंबरम यांनी सादर केलेला अर्थसंकल्प कल्पनेच्या पलीकडला, अवास्तव आणि रटाळ असल्याची टीका लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी केली. महागाई नियंत्रणा आणण्यासाठी या अर्थसंकल्पात कोणतीच तरतूद करण्यात आलेली नाही, असेही त्या म्हणाल्या.
खर्च कमी करण्यासाठी अर्थमंत्र्यांनी केवळ आकड्यांचा गोलमाल केला असल्याची टीका राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरूण जेटली यांनी केली. अर्थसंकल्पात वास्तवाचे भान नसल्याची टीका त्यांनी केली.
चिदंबरम यांचा अर्थसंकल्प गरीबविरोधी आणि शेतकऱयांच्याविरोधी असल्याची टीका समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांनी केली. बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी हे बजेट गोंधळ निर्माण करणारे असल्याचे म्हटले आहे.




















भारतीय सत्ताधारी राजकारण्यांनी “अर्थ” ह्या शब्दाला “कंप” सुटल्याचे चित्र आजच्या अर्थसंकल्पात स्पष्टपणे रेखाटले आहे.
सध्या तिजोरीत खडखडाट आहे,तरीही सरकारी कंपन्या विकून आपली भूक भागविणे कटाक्षाने टाळले आहे त्या बद्दल सरकारचे अभिनंदन करावयास हवे. एकेकाळी :लालू: ह्यांनी रेल्वे कशी फायद्यात आहे हे हात चलाखी किवा जादू करून दाखवून दिले होते,तशी जादू आज अर्थमंत्र्यांनी केली नाही हे चांगलेच झाले. वित्तीय तुट कशी भरून काढायची ह्याचे उत्तर निवडणुकी नंतर देवू असे त्यांनी आज दाखवून दिले आहे.सध्या तरी सरकार कोमात गेल्याचे चित्र आहे अर्थात हि झोप मे २०१४ पर्यंत आहे बाकी आगे देखो होता है क्या?अर्थात ह्याचे उत्तर काँग्रेसी जाहीर नाम्यात मिळणार हे आज नक्की झाले.
प्रवीण आंबेसकर,ठाणे