विवाह समारंभ आटोपून घरी परतताना झालेल्या भीषण अपघातात नवदाम्पत्यासह १५ जण ठार झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी पश्चिम बंगालमधील मादरीहाट येथील महामार्ग क्रमांक ३१ वर घडली. लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणारी गाडी आणि विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकची जोरदार धडक होऊन ही दुर्घटना घडली. त्यामध्ये नवदाम्पत्यासह १५ जण जागीच ठार झाले तर अन्य सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये गाडीचा चालक आणि त्याच्या सहकाऱ्याचाही समावेश आहे, असे पोलीस अधीक्षक आकाश मेघारिया यांनी सांगितले.गंभीररीत्या जखमी झालेल्या सहा जणांपैकी तीन जण उपचार सुरू असताना मरण पावले.