पूर्वीच्या सरकारने खाणी उद्योगपतींना दिल्या, तर भाजप सरकारने खाणींचा लिलाव तसेच स्पेक्ट्रम वाटपातून तीन लाख कोटी रुपये मिळवले. त्यामुळे सरकारवर उद्योगधार्जिणे असल्याची टीका करण्याचा सोनिया गांधी यांना अधिकार नाही, अशी टीका भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी केली.  विरोधक मोदी सरकारविरोधात अपप्रचार करत असल्याची टीका येथील कार्यकर्ता मेळाव्यात केली. हे सरकार गरिबांसाठी काम करणारे असून त्यासाठी सरकारने विविध पावले उचलल्याचे सांगितले.