मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- टोलप्रकरणी हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांनी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी
- सोलापूर विद्यापीठाच्या नामांतरावरून राजकारण रंगू लागले
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- जमिनीच्या वादातून बिल्डरवर गोळीबार; प्रकृती चिंताजनक
- ताडोबाच्या बफरझोनमध्ये वनभ्रमंतीला चालना देण्याची मागणी
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पोलिसांना दिलेल्या धमकीवजा आदेशामुळेच आपल्याला कोलकाता भेट रद्द करणे भाग पडले, असा आरोप वादग्रस्त लेखक सलमान रश्दी यांनी एका पत्रकाद्वारे केला आहे.
६५ वर्षीय रश्दी यांनी गुरुवारी देश सोडून जाताना हे एकपानी पत्रक जारी केले आहे. त्यात ते म्हणतात की, कोलकाता विमानतळावर उतरल्यानंतर तातडीने विमानतळावरूनच दुसऱ्या विमानाद्वारे त्यांची गच्छंती करावी, असे आदेश ममता बॅनर्जी यांनी आपल्या भेटीच्या पाश्र्वभूमीवर पोलिसांना दिले होते. या आदेशामुळे पोलिसांनी आपली कोलकाता भेट 'अशक्य' तर करून टाकलीच त्याचबरोबर प्रसारमाध्यमे व मुस्लिम नेत्यांना आपल्या कार्यक्रमाची माहिती देऊन त्यांना निषेध व्यक्त करण्यासाठी चिथावणीही दिली.
कोलकाताला जाण्यासाठी सज्ज असताना त्याच्या एक दिवस अगोदर पोलिसांकडून आपल्या शहर-भेटीला मज्जाव करण्यात येईल, असे आपल्याला सांगितले गेले. पोलीस शहरात प्रवेश करू देणार नाहीत व कोणत्याही प्रकारे तसा प्रयत्न झाल्यास लगोलग दुसऱ्या विमानाने आपली राज्याबाहेर पाठवणी करण्यात येईल, असे आपल्याला सांगण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या आदेशवजा विनंतीवरूनच ही बंदी घातली गेली, असे या पत्रकात रश्दी यांनी म्हटले आहे.
पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार ३० जानेवारी रोजी होणाऱ्या साहित्यिकांच्या सभेत रश्दी हे 'आकस्मिक पाहुणे' म्हणून सहभागी होणार होते. आपल्या कादंबरीवर आधारित 'मिडनाइट्स चिल्ड्रन'च्या प्रमोशनातही ते सहभाग घेणार होते, मात्र आयोजकांनी त्यांना बोलावण्याचे टाळले.
कोलकाता येथील साहित्य सभेत मी सहभागी होणार होतो ही गोष्ट खरी आहे. चित्रपट दिग्दर्शिका दीपा मेहता, अभिनेता राहुल बोस आणि रुचिर जोशी ३० जानेवारी रोजी होणाऱ्या या वार्तालापात सहभागी होणार होते. आयोजकांना याची जाणीव होती व म्हणूनच त्यांनी मला
'आकस्मिक पाहुणे' म्हणून निमंत्रण धाडले होते. आता ही गोष्ट जर ते अमान्य करत असतील तर तो त्यांचा अप्रामाणिकपणा आहे. त्यांनी मला विमानाच्या तिकिटाचे पैसेही दिले आहेत, असेही रश्दी यांनी म्हटले आहे.
बुकर पुरस्कार विजेत्या रश्दी यांनी याबाबत ट्विटरवरही हेच भाष्य केले आहे. त्यात ते म्हणतात, कोलकातात प्रवेश करू नका, असा 'मित्रत्वाचा सल्ला' आपल्याला कोणीही दिला नाही, त्याउलट ममता बॅनर्जी यांनी पोलिसांना माझ्या प्रवेशबंदीचे आदेश दिल्याचे रश्दी यांनी म्हटले आहे.
दरम्यान, देश सोडण्याअगोदर गुरुवारी मुंबईत सलमान रश्दी यांनी 'मिडनाइट्स चिल्ड्रन'च्या प्रीमियरला हजेरी लावली. या चित्रपटातील कलावंतही या प्रसंगी हजर होते.
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा



















