भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळून सात जण ठार झाल्याची घटना शुक्रवारी येथे घडली. हवाई दलाचे ध्रुव हेलिकॉप्टर बरेली येथून अलाहाबादकडे जात असताना अटारिया जिल्ह्य़ानजीक मणिपुरवा येथे ते कोसळले. हेलिकॉप्टरला अचानक आग लागल्यामुळे हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. हेलिकॉप्टर कोसळले त्यावेळी त्याला अग्निज्वाळांनी लपेटले होते. हवाई दलाने या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून त्यांचे पथक सीतापूरला रवाना झाले आहे. विंग कमांडर, स्क्वाड्रन लीडर, ज्युनियर वॉरंट ऑफिसर, सरजट व एलएसी,  इतर दोन कनिष्ठ अधिकारी यात मरण पावले.