(लघवी करताना जळजळ होणे)असे का होते?उन्हाळ्यात वाढती उष्णता आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. त्याचबरोबर लघवीचे प्रमाणही कमी होते. त्याचा परिणाम म्हणून मूत्रदाह होतो.इतर काळजी काय घ्यावी?* तिखट व खारट पदार्थ खाणे टाळावे. *उन्हात फिरणे टाळावे.यावर उपाय काय?*चंदनाचे खोड उगाळून त्याचा अर्धा चमचा गंध थंड पाण्यात घालून प्यावा. त्रास असेपर्यंत दररोज असे करावे.*भरपूर पाणी प्यावे. विशेषत: वाळा घातलेले पाणी जरूर घ्यावे.*त्याचबरोबर उसाचा रस, नारळीचे पाणी, कोकम सरबत, आवळा सरबत अशी सरबते प्यावीत.*आहारात कलिंगड, द्राक्षे, आंबा अशी फळे तसेच, काकडीचा समावेश करावा.