पाकिस्तान व झिम्बाब्वे यांच्यात होणाऱ्या आगामी क्रिकेट मालिकेसाठी पंच पाठविण्यास आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) नकार दिला आहे. पाकिस्तानात होणाऱ्या या सामन्यांसाठी सुरक्षिततेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे.
श्रीलंकेने २००९ मध्ये पाकिस्तानचा दौरा केला होता, त्या वेळी त्यांच्या खेळाडूंच्या बसवर अतिरेक्यांनी हल्ला केला होता. लंकेने त्वरित या दौऱ्यातून माघार घेतली होती. त्यानंतर आजपर्यंत पाकिस्तानात एकाही देशाने दौरा केलेला नाही.