श्रीलंकेविरुद्धची दोन कसोटी सामन्यांची मालिका गमावल्यामुळे इंग्लंडच्या संघाचा आत्मविश्वास खालावण्याची शक्यता आहे. मात्र अनुनभवी खेळाडूंसह पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणे हे नवीन आव्हान असल्याचे मत भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने व्यक्त केले.  
‘‘इंग्लंडच्या संघाला मायदेशातील खेळपट्टय़ांची पूर्ण कल्पना आहे, त्यामुळे हा खडतर मुकाबला आहे. इंग्लंडचा संघ संतुलित आहे. त्यामुळे हा तुल्यबळ मुकाबला असेल,’’ असे धोनीने सांगितले.