लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचे महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यातील मतदान गुरुवार २४ एप्रिल रोजी होणार असून त्या दिवशी औद्योगिक उपक्रम, दुकाने व व्यापारी संस्थांमध्ये काम करणाऱ्या कामगार आणि कर्मचाऱ्यांना मतदानासाठी भरपगारी सुट्टी देण्याचे निर्देश भारतीय निवडणूक आयोगाकडून देण्यात आले आहेत. तसेच मतदानाच्या दिवशी सर्व दुकाने व व्यापारी आस्थापने बंद ठेवण्याच्या सूचनाही आयोगाने दिले आहेत.