scorecardresearch

भारतीय जनता पार्टी

भारतीय जनता पार्टी (BJP) हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय स्तरावरील राजकीय पक्ष आहे. २०१४ सालापासून सलग दोन निवडणुकांमध्ये भाजपाचे बहुमत मिळवत सत्ता राखली. नरेंद्र मोदी भाजपाचे सर्वोच्च नेते असून अमित शाह दुसऱ्या पातळीवरचे नेते मानले जातात. तर जेपी नड्डा हे भाजपाचे सध्याचे अध्यक्ष आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत दुसऱ्यांदा भारतीय जनता पक्षाने बाजी मारली. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला (Bharatiya Janata Party) ४८ पैकी २३ जागा मिळाल्या. मात्र, मुख्यमंत्रीपदावरून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत फूट पडली आणि त्यांची युती तुटली. त्यानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि इंडियन नॅशनल काँग्रेसबरोबर युती करत महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली. १९५१ साली श्यामाप्रसाद मुखर्जी ह्यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली.

जनसंघ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राजकीय अंग मानले जात असे. काँग्रेस (Congress) व तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू ह्यांच्याकडून पाकिस्तानचे होणारे लांगूलचालन रोखणे व भारतामधील हिंदूंचे हित जपणे ही जनसंघाची उद्दिष्टे होती. स्थापनेनंतर जम्मू आणि काश्मीर भारतामध्ये संपूर्ण सामावून घेतला जावा अशी आग्रही भूमिका जनसंघाने घेतली व या दरम्यान आंदोलन करताना अटक झालेल्या मुखर्जी ह्यांचे काश्मीरच्या तुरुंगातच निधन झाले. दीनदयाल उपाध्याय व त्यानंतर अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी ह्या तरुण नेत्यांनी जनसंघाची सूत्रे हातात घेतली. १९५२ सालच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनसंघाला केवळ ३ जागांवर विजय मिळाला. १९६७ सालच्या देशव्यापी विधानसभा निवडणुकांमध्ये जनसंघाने अनेक लहान प्रादेशिक पक्षांसोबत युती केली व मध्य प्रदेश, बिहार व उत्तर प्रदेश राज्यांमध्ये सरकारे स्थापन केली.

१९७५ साली पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) ह्यांनी लागू केलेल्या देशव्यापी आणीबाणीला जनसंघाने कडाक्याचा विरोध केला व जनसंघाच्या अनेक सदस्यांना तुरुंगात डांबले गेले. १९७७ साली आणीबाणी उठल्यानंतर जनसंघाने भारतीय लोकदल, काँग्रेस (ओ), सोशालिस्ट पार्टी इत्यादी पक्षांसोबत एकत्र येऊन जनता पक्षाची स्थापना केली. जयप्रकाश नारायण, मोरारजी देसाई इत्यादी नेते जनता पक्षाचे सदस्य होते. १९७७ सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनता पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले व मोरारजी देसाई पंतप्रधान तर अटलबिहारी वाजपेयी परराष्ट्रमंत्री बनले. परंतु अंतर्गत कलहामुळे ग्रासलेले जनता पार्टी सरकार १९८० साली कोसळले व जनता पार्टीचे विघटन झाले. जनता पार्टीच्या विघटनानंतर भारतीय जनता पार्टीची (Bhajapa) स्थापना झाली व अटलबिहारी वाजपेयी पक्षाचे पहिले अध्यक्ष बनले. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी. नरेंद्र मोदी (Narendra Modi), राजनाथ सिंह, वेंकय्या नायडू, थॅंवरचंद गेहलोत, शिवराजसिंग चौहान, जे.पी. नड्डा असे अनेक नेते भाजपाचे प्रमुख चेहरे बनले. तर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, आशिष शेलार, किरीट सोमैय्या, चंद्रकांत पाटील एकनाथ खडसे प्रमुख चेहरे आहेत.
Read More
how did Ujjwal Nikam enter politics
प्रमोद महाजन हत्या ते २६/११ चा खटला, उज्ज्वल निकम राजकारणात कसे आले?

निकम यांनी अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील महत्त्वाच्या प्रकरणांची गुंतागुंत सोडवण्यात मदत केली आहे. २०११ चा तिहेरी बॉम्बस्फोट, शक्ती मिल सामूहिक बलात्कार…

Sharad Pawar On PM Narendra Modi
“मोदी ज्या पद्धतीने देश चालवतात ते पाहून…”; शरद पवार यांचा हल्लाबोल

महाविकास आघाडीची आज सासवडमध्ये जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला.

Chhagan Bhujbal On Manoj Jarange
“मनोज जरांगे पंतप्रधान मोदी यांच्यापेक्षा मोठे नेते”; छगन भुजबळ यांचा खोचक टोला

मनोज जरांगे-पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात पुन्हा एकदा वाकयुद्ध रंगले आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे-पाटील…

Ujjwal Nikams Lok Sabha candidature from BJP said Sanjay Raut
Sanjay Raut on Ujjawal Nikam: भाजपाकडून लोकसभेसाठी उज्ज्वल निकम यांना उमेदवारी, संजय राऊत म्हणाले…

भारतीय जनता पार्टीने उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांना शनिवारी उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे उत्तर मध्य…

Sanjay Raut criticise Ajit Pawar over Baramati Loksabha
“त्यांच्यावर पत्रावळी उचलायची वेळ आली असती”, राऊतांची अजित पवारांवर टीका| Sanjay Raut on Ajit Pawar

“त्यांच्यावर पत्रावळी उचलायची वेळ आली असती”, राऊतांची अजित पवारांवर टीका| Sanjay Raut on Ajit Pawar

Ujjwal Nikam say after joining the BJP and getting the nomination from North Central Mumbai
Ujjwal Nikam: भाजपात प्रवेश अन् उत्तर मध्य मुंबईमधून उमेदवारी मिळाल्यानंतर उज्ज्वल निकम काय म्हणाले?

भाजपने उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून प्रख्यात कायदेपंडित उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून या मतदारसंघात…

Journalists question about Modi and Sanjay Rauts reaction
पत्रकाराचा मोदींबद्दलचा प्रश्न अन् संजय राऊतांची ‘अशी’ प्रतिक्रिया! | Sanjay Raut on Modi

पत्रकाराचा मोदींबद्दलचा प्रश्न अन् संजय राऊतांची ‘अशी’ प्रतिक्रिया! | Sanjay Raut on Modi

Yogi Adityanath up rally
उत्तर प्रदेशात नरेंद्र मोदी आणि योगींच्याच विरोधकांपेक्षा अधिक सभा!

२६ एप्रिलपर्यंतच्या तीन आठवड्यांत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ३८ रॅली आणि प्रबुद्ध संमेलनांना संबोधित केले होते. एआयसीसीच्या सरचिटणीस…

Sanjay Raut On Ujjwal Nikam
संजय राऊत यांचा मोठा दावा; म्हणाले, “उज्ज्वल निकम उमेदवार असले तरी…”

भाजपाने उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिल्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

Chandrashekhar bawankule, bawankule claims that NCP sharad Pawar Group s all Candidates Will Be Defeated, lok sabha 2024, sharad Pawar Group, sharad Pawar Group going to Be Zero, bjp, satara lok sabha seat, election campaign, marathi news, satara news, sharad pawar, bjp state president Chandrashekhar bawankule,
महाराष्ट्रात पवार गट शून्य होणार, चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा

आताच्या या निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे महाराष्ट्रातील सर्व उमेदवार पराभूत होतील आणि पवार गट शुन्य होईल, असा दावा भाजपचे…

Ashish Shelar On Ujjwal Nikam
उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर होताच आशिष शेलारांचं ट्वीट; म्हणाले, “मुंबईचे योद्धे…”

प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांना भारतीय जनता पार्टीने उमेदवारी जाहीर केली आहे. उज्ज्वल निकम यांना उमेदवारी मिळाल्यानंतर मुंबई भाजपाचे अध्यक्ष…

संबंधित बातम्या