scorecardresearch

भारतीय जनता पार्टी

भारतीय जनता पक्ष (BJP) हा देशातील प्रमुख पक्षांपैकी एक पक्ष आहे. देशात २०१४, २०१९ आणि २०२४ साली या पक्षाला सत्तास्थापनेची संधी मिळाली. मात्र गेल्या दोन लोकसभा निवडणुकीच्या (२०१४, २०१९) तुलनेत भाजपाला २०२४ साली स्वबळावर बहुमताचा आकडा गाठता आला नाही.


२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला केवळ २९३ जागांवरच समाधान मानावे लागले. यात भाजपाचा वाटा २४० इतका आहे. २०१४ मध्ये २८२ आणि २०१९ मध्ये ३०३ जागा जिंकत स्वबळावर बहुमताचा आकडा भाजपाने पार केला होता. मात्र २०२४ मध्ये काँग्रेसच्या नेतृत्त्वातील विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने भाजपासमोर मोठे आव्हान उभे केले होते. परिणामी भाजपाला अनेक जागांवर पराभव पत्करावा लागला. उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, पश्चिम बंगाल, राजस्थान या ठिकाणी भाजपाला फटका बसला.


संविधानात बदल घडवण्याची चर्चा, कांद्याला भाव, महागाई, बेरोजगारी, पिकाला हमीभाव आदी प्रश्नांवर विरोधकांनी भाजपाला कोंडीत टाकले होते. या कारणांमुळे भाजपाला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत फटका बसल्याचे बोलले जाते. भाजपाला सहयोगी पक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन करण्यात यश आले आहे.


पक्षाची स्थपाना आणि इतिहास (Formation and History of the BJP)

१९५१ साली श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली होती. जनसंघ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राजकीय अंग मानले जात असे. काँग्रेस (Congress) व तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याकडून पाकिस्तानचे होणारे लांगूलचालन रोखणे व भारतामधील हिंदूंचे हित जपणे ही जनसंघाची उद्दिष्टे होती. स्थापनेनंतर जम्मू आणि काश्मीर भारतामध्ये संपूर्ण सामावून घेतला जावा अशी आग्रही भूमिका जनसंघाने घेतली व या दरम्यान आंदोलन करताना अटक झालेल्या मुखर्जी यांचे काश्मीरच्या तुरुंगातच निधन झाले. दीनदयाल उपाध्याय व त्यानंतर अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी या तरुण नेत्यांनी जनसंघाची सूत्रे हातात घेतली. १९५२ सालच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनसंघाला केवळ ३ जागांवर विजय मिळाला. १९६७ सालच्या देशव्यापी विधानसभा निवडणुकांमध्ये जनसंघाने अनेक लहान प्रादेशिक पक्षांसोबत युती केली व मध्य प्रदेश, बिहार व उत्तर प्रदेश राज्यांमध्ये सरकारे स्थापन केली.


१९७५ साली पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी लागू केलेल्या देशव्यापी आणीबाणीला जनसंघाने कडाक्याचा विरोध केला व जनसंघाच्या अनेक सदस्यांना तुरुंगात डांबले गेले. १९७७ साली आणीबाणी उठल्यानंतर जनसंघाने भारतीय लोकदल, काँग्रेस (ओ), सोशालिस्ट पार्टी इत्यादी पक्षांसोबत एकत्र येऊन जनता पक्षाची स्थापना केली. जयप्रकाश नारायण, मोरारजी देसाई इत्यादी नेते जनता पक्षाचे सदस्य होते. १९७७ सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनता पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले व मोरारजी देसाई पंतप्रधान तर अटलबिहारी वाजपेयी परराष्ट्रमंत्री बनले. परंतु अंतर्गत कलहामुळे ग्रासलेले जनता पार्टी सरकार १९८० साली कोसळले व जनता पार्टीचे विघटन झाले. जनता पार्टीच्या विघटनानंतर भारतीय जनता पार्टीची (BJP) स्थापना झाली व अटलबिहारी वाजपेयी पक्षाचे पहिले अध्यक्ष बनले. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी. नरेंद्र मोदी (Narendra Modi), राजनाथ सिंह, वेंकय्या नायडू, थावरचंद गेहलोत, शिवराजसिंह चौहान, जे.पी. नड्डा असे अनेक नेते भाजपाचे प्रमुख चेहरे बनले. तर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, आशिष शेलार, किरीट सोमैय्या, चंद्रकांत पाटील एकनाथ खडसे प्रमुख चेहरे आहेत.


Read More
दहशतवादाविरोधात सरकारच्या पाठीशी- विरोधी पक्षांचा पवित्रा; मग नाराजी कशावरून?

बहुपक्षीय शिष्टमंडळांसाठी सरकारनं नावं मागितली नाहीत, या रिजिजू यांच्या विधानाचा काँग्रेसनं विरोध केला आहे. सरकारने केलेला दावा खोटा असल्याचे काँग्रेसचे…

Congress protest against BJP minister Vijay Shah
देशाचे सैनिक, तिरंग्याचा अपमान करणाऱ्या भाजपा नेत्यांच्या छायाचित्राला जोडे मारून, शेण मारून निषेध

मध्यप्रदेश येथील भाजपा नेते व मंत्री विजय शाह व उपमुख्यमंत्री जगदीश देवाडे यांच्या प्रतिकात्मक चित्राला जोडे चप्पलने बडवत, शेण चिखल…

clash in Nanded BJP NCP over party workers criminal backgrounds
एक गुन्हेगार तुमचा, एक आमचा; नांदेडमध्ये भाजप, राष्ट्रवादीत जुंपली

लोकसभा निवडणुकीपूर्वीपासून प्रताप पाटील चिखलीकर आणि अशोक चव्हाण यांच्यामध्ये राजकीय संघर्ष सुरू होताच. आता या संघर्षाला ‘ एक गुन्हेगार तुमचा,…

kalyan dombivli development work eknath shinde ravindra chavhan dr shrikant shinde
कल्याण-डोंबिवलीत विकासकामांच्या धडाक्यात भाजप नजरेआड

ठाणे जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांच्या वर्चस्वाला गणेश नाईक सातत्याने आव्हान देत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नाईकांना या सोहळ्यांपासून दूर ठेवत…

In Pune municipal elections BJP is insisting on contesting on its own, Ajit Pawar NCP and Shinde Shiv Sena ready to go ahead alone
पुण्यात भाजपचा स्वबळाचा; राष्ट्रवादी, शिवसेनेचा ‘एकला चलो रे’चा नारा

महापालिका निवडणुकीत महायुती होणार की नाही, हे वरिष्ठांच्या मर्जीवर अवलंबून असले, तरी तिन्ही पक्ष स्वबळाच्यादृष्टीने तयारीला लागल्याने इच्छुकांमध्ये उत्साह संचारल्याचे…

bjp old post on chhagan bhujbal maharashtra sadan scam
‘विसरलानाहीमहाराष्ट्र’, भाजपानं भुजबळांवर आरोप केलेली जुनी पोस्ट व्हायरल; १०० कोटींच्या घोटाळ्याचा दिला होता तपशील!

BJP Old Tweet Viral: मंत्री छगन भुजबळ यांना १०० कोटींच्या महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी लक्ष्य करणारी भाजपाची एक जुनी पोस्ट व्हायरल…

गुजरातमधील ढासळत्या काँग्रेस नेतृत्वाला कारणीभूत नेमकं काय?

राहुल गांधी यांनी मार्चमध्ये अहमदाबादच्या दौऱ्यादरम्यान हा मुद्दा उपस्थित केला होता. तेव्हा त्यांनी काँग्रेस नेत्यांचा एक गट भाजपाशी संगनमत करीत…

मुंबई महापालिका निवडणूक मित्रपक्ष स्वबळावर लढू शकतात, भाजपाचा नेमका इशारा काय?

२०१७ मध्ये झालेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ८२ जागांसह भाजपा ८४ जागा असलेल्या अविभाजित शिवसेनेपेक्षा पिछाडीवर होती. त्यावेळी दोन्ही मित्रपक्ष होते.…

What did Vansat More say about Sanjay Rauts book
Vasant More: “भाजपाचे नेते चोरुन…”; संजय राऊतांच्या पुस्तकाबद्दल काय म्हणाले मोरे?

Vasant More On Sanjay Raut: खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शनिवारी (१७ मे) पार पडला.…

Yusuf Pathan
“मी उपलब्ध नाही”, पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी जाणाऱ्या शिष्टमंडळाबरोबर जायला युसूफ पठाण यांचा नकार

Yusuf Pathan on all-party delegation : युसूफ पठाण यांनी स्वतःच केंद्र सरकारला सांगितलं आहे की ज्या काळात हे शिष्टमंडळ दौरे…

In Sangli, while selecting the BJP district president, the focus is on maintaining caste balance in upcoming local government elections
सांगलीत भाजपचा जिल्हाध्यक्ष निवडीत जातीय समतोल राखण्यावर भर

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने जिल्हाध्यक्षांची खांदेपालट करत ग्रामीणचे अध्यक्षपद वाळव्यातील महाडिक गटाकडे तर शहराचे अध्यक्षपद कुपवाडला दिले आहे.

संबंधित बातम्या