उदरनिर्वाहासाठी कोकणामधील (Konkan) असंख्य लोक मुंबईकडे रवाना होऊन मिळेल ते काम करुन राहू लागले, त्यातील बहुसंख्य गिरण्यांमध्ये काम करत असतं. कोकणी माणसासाठी सण-उत्सव फार महत्त्वपूर्ण असतात. त्यासाठी गावाला जाण्यासाठी पूर्वी जहाजाचा प्रवास करावा लागे. पुढे एसटी आल्यानंतर चाकरमान्याचे कमी हाल होऊ लागले. पण हा प्रवास त्रासदायक असे. दरम्यानच्या काळात कोकणामध्ये जाण्यासाठी रेल्वे असावी असा विचार काहींच्या मनात आला. त्यात मुंबई व मंगळूर या दोन बंदरांदरम्यान थेट मार्ग नसल्यामुळे रेल्वे वाहतूक लांबच्या मार्गाने करावा लागे. उंचसखल भूभाग, अनेक नद्या, अतिवृष्टी या कारणांमुळे कोकणामध्ये रेल्वे विभाग उभारण्यास अडचणी येत होत्या. रेल्वे वाहतूक उपलब्ध नसल्यामुळे कोकणाचा विकास खुंटण्याची भिती लोकांमध्ये होती. जॉर्ज फर्नान्डिस यांच्या नेतृत्वाखाली कोकणी नेत्यांनी केंद्रामध्ये कोकण रेल्वे बांधण्याची मागणी केली. १९६६ साली दिवा-पनवेल रेल्वेचा मार्ग बांधला गेला व १९८६ मध्ये तो रोहापर्यंत वाढवला गेला.
१५ सप्टेंबर १९९० रोजी रोहा येथे कोकण रेल्वेचा (Konkan Railway) पायाभरणी समारंभ पार पडला. कोकण रेल्वेमार्गावरील पहिली रेल्वे २० मार्च १९९३ रोजी मंगळूर ते उडुपी दरम्यान धावली. १९९८ मध्ये कोकण रेल्वेचे उद्घाटन करण्यात आले आणि १९ जुलै १९९९ रोजी सर्वप्रथम सर्वसामान्य नागरिकांना कोकण रेल्वेचा लाभ घेता आला.Read More
निवडणुकीसाठी कोकणात आलेल्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी कोकण रेल्वेने आज, ८ फेब्रुवारी रोजी चिपळूण–पनवेल आणि पनवेल–रत्नागिरी मार्गावर विशेष अनारक्षित मेमू गाड्या सोडण्याचा…
आंगणेवाडीच्या श्री भराडी देवीच्या जत्रेनिमित्त कोकण रेल्वेने मुंबईहून सिंधुदुर्गासाठी चार विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला असून भाविकांच्या सोयीसाठी ७ फेब्रुवारीपासून…
देशातील सर्वाधिक गजबजलेल्या स्थानकांपैकी एक मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे स्थानक आहे. दररोज येथून अर्धशतकांहुन अधिक रेल्वेगाड्या धावतात.
Mangala Lakshadweep Express : कोकण रेल्वे मार्गावरील दिवाण खवटी ते विन्हेरे स्थानकादरम्यान मंगला एक्सप्रेसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने काही काळ विस्कळीत…
Konkan Railway : चाकरमान्यांची लाडकी दिवा-सावंतवाडी एक्सप्रेस आता नव्या वेळेनुसार धावणार असून प्रवासाचे नियोजन करण्यापूर्वी प्रवाशांनी मध्य रेल्वेने जारी केलेले…