भारतीय आयुर्विमा महामंडळ (Life Insurance Corporation of India) ही भारत देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. या कंपनीला एलआयसी असेही म्हटले जाते. १८१८ मध्ये भारतामध्ये ओरिएंटल लाइफ इन्शुरन्स कंपनी या पहिल्या विमा कंपनीची सुरुवात झाली.
पुढे साल १९५६ पर्यंत विमा सेवा आणि निधी सेवा पुरविणाऱ्या सुमारे २४५ भारतीय तसेच परकीय कंपन्या देशामध्ये अस्तित्त्वामध्ये होत्या. तेव्हा सरकारने त्यांना ताब्यात घेत त्यांचे राष्ट्रीयकरण करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर १९ जून १९५६ रोजी संसदेत एल आय सी कायदा संमत केला आणि १ सप्टेंबर १९५६ रोजी एलआयसीची स्थापना झाली. मुंबईमध्ये या कंपनीचे मुख्यालय आहे. सध्या भारतामध्ये २ लाखांपेक्षा जास्त एलआयसी एजंट्स कार्यरत आहेत.
कंपनीच्या स्थापनेपासून आत्तापर्यंत जीवन विमा विभागामध्ये या संस्थेची मक्तेदारी आहे. २०२१ मध्ये एलआयसीद्वारे सुमारे ६,९३,९०४ कोटी रुपयांचा महसूल गोळा करण्यात आला. त्या वर्षामध्ये तब्बल २,९७४ कोटींचा नफा संस्थेला झाला. Read More
आयडीबीआय बँकेच्या विक्रीसाठी आलेल्या बोली ‘राखीव किमती’पेक्षा कमी असल्याने खासगीकरणाची प्रक्रिया पुन्हा रखडली असून, सरकार आता सुधारित आर्थिक बोली मागवण्याची…
आयडीबीआय बँकेच्या खासगीकरणाची प्रक्रिया केंद्र सरकारने तूर्तास लांबणीवर टाकल्याने सोमवारी बँकेच्या शेअर्समध्ये १६.५ टक्क्यांची मोठी घसरण होऊन गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान…
एलआयसी म्युच्युअल फंडाने एआय, सेमीकंडक्टर आणि डिजिटल अर्थव्यवस्थेतील गुंतवणुकीची संधी देणारा ‘एलआयसी एमएफ टेक्नॉलॉजी फंड’ २० फेब्रुवारीपासून गुंतवणूकदारांसाठी खुला केला…
भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) जागतिक मंदीच्या सावटातही आयटी क्षेत्रावर मोठा विश्वास दाखवत टीसीएस आणि एचसीएल सारख्या कंपन्यांमध्ये हजारो कोटी रुपयांची…