मुंबई : भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीने बाजारभांडवलाच्या बाबतीत सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेला मागे सारत पहिले स्थान मिळविले आहे. परिणामी एलआयसी आता देशातील सर्वात मूल्यवाल सरकारी कंपनी बनली आहे.

हेही वाचा >>> ‘आत्मनिर्भर एसआयपी’ सुविधा माहिती आहे का?

2024 Force Gurkha launch
Mahindra Thar चा खेळ संपणार? १० सीटर कार आणल्यानंतर फोर्सची Gurkha नव्या अवतारात देशात दाखल
SEBI approval of ICRA subsidiary for ESG rating
ईएसजी’ मानांकनासाठी इक्राच्या उपकंपनीला सेबीची मान्यता
Toyota Innova Hycross GX(O) launch
XUV700, Scorpio सर्व विसरुन जाल! देशात आली ७ रंगांत ८ सीटर कार, मोठ्या कुटुंबियांसाठी आहे बेस्ट
jharkhand marathi news, logistic company fraud
झारखंडमधील कंपनीची पावणेसहा कोटींची फसवणूक, लॉजिस्टीक कंपनीच्या तिघांविरोधात गुन्हा

एलआयसीचे बाजार भांडवल बुधवारच्या सत्रात ५,६१,३४३ कोटी रुपयांवर पोहोचले आहे, तर त्याच सत्राअखेर स्टेट बँकेचे बाजारभांडवल ५,५८,६८० रुपयांवर स्थिरावले. परिणामी स्टेट बँकेपेक्षा २६६३ कोटी रुपये अधिक आहे. एलआयसी आता देशातील पहिल्या दहा सर्वात मूल्यवान कंपन्यांच्या क्रमवारीत नवव्या स्थानावर आहे. १८,४२,१६० कोटी रुपयांच्या बाजारमूल्यासह रिलायन्स इंडस्ट्रीज ही देशातील सर्वात मूल्यवान कंपनी आहे. त्यापाठोपाठ टीसीएसचे बाजारभांडवल १४,२१,२३० कोटी, एचडीएफसी बँक ११,६६,८८८ कोटी, आयसीआयसीआय बँक ६,८७,७४० कोटी, इन्फोसिस ६,८०,६३१ कोटी, भारती एअरटेल ६,१०,३८९ कोटी, हिंदुस्थान युनिलिव्हर ६,०२,३८८ कोटी आणि आयटीसी ५,८२,४२३ कोटी रुपये आहे.

हेही वाचा >>> खाद्यतेल वर्षभर स्वस्त; आयातीला मार्च २०२५ पर्यंत मुदतवाढ

देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेली एलआयसी मे २०२२ मध्ये भांडवली बाजारात सूचिबद्ध झाली होती. सरकारने प्रारंभिक समभाग विक्रीच्या माध्यमातून एलआयसीचे ३.५ कोटी समभागांची विक्री केली. सध्या कंपनीत सरकारचा ९६.५ टक्के हिस्सेदारी आहे.