केंद्रात सत्ता येण्यासाठी उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र अशा मोठ्या राज्यांनंतर बिहारमधून सर्वाधिक खासदार निवडून येणे गरजेचे ठरते. उत्तर भारतातील राजकारणामध्ये वरचष्मा टिकवून ठेवण्यासाठीही केंद्रातील सत्तेची ती गरज ठरते.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एनडीए आणि इंडिया आघाडी या दोन्ही गटांनी आपापल्या जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला आहे. दोन्ही गटांतील घटक पक्षांनीही आपले उमेदवार जाहीर केले आहेत.
सुटकेच्या एका वर्षानंतर ६२ वर्षीय महातो यांनी बख्तियारपूरमध्ये ४६ वर्षीय कुमारी अनिताशी लग्न केले. विशेष म्हणजे, हे लग्न केवळ लोकसभेचे तिकीट मिळवण्यासाठी करण्यात आले, अशी चर्चा आहे.
एनडीएतील पक्षांनी राज्यातील ४० लोकसभा मतदारसंघांचं वाटप पूर्ण केलं आहे. बिहार भाजपाचे प्रभारी विनोद तावडे यांनी राज्यातील एनडीएचा जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला आहे.
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या निवासस्थानी बिहारमधील एनडीएतल्या मित्रपक्षांची बैठक पार पडली. या बैठकीत जागावाटपावर प्रदीर्घ चर्चा झाली.
लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याआधी ‘एनडीए’तील घटक पक्षांशी जागावाटपाचा तिढा सोडवण्याच्या मागे भाजप लागला असताना बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दलाचे प्रमुख नितीशकुमार मात्र ब्रिटनला निघून गेले आहेत.