नवी दिल्ली :खासगी क्षेत्रातील अग्रणी दूरसंचार कंपनी भारती एअरटेलने नवीन युगाच्या ‘५ जी’ सेवेसाठी पहिल्या ३० दिवसांतच दहा लाख ग्राहकसंख्येचा टप्पा ओलंडला आहे. सध्या कंपनीने ठरावीक शहरांमध्ये ‘५ जी’सेवेला सुरुवात केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एअरटेलने पहिल्या टप्प्यामध्ये दिल्ली, मुंबई, चेन्नई, बेंगळूरु, हैदराबाद, सिलीगुडी, नागपूर आणि वाराणसी येथे मर्यादित स्वरूपात ‘५ जी’ची सेवा सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्टला ‘५ जी’च्या अनावरणाची घोषणा केल्यानंतर खासगी क्षेत्रातील भारती एअरटेल आणि रिलायन्स जिओने सेवेला सुरुवात केली. एअरटेलने दिलेल्या माहितीनुसार, कंपनी टप्प्याटप्प्याने विविध शहरांमध्ये सेवा विस्तारणार आहे. मात्र आताच या नवीन सेवेसाठी कंपनीने दहा लाख ग्राहकांचा टप्पा गाठला आहे. इतक्या कमी कालावधीत ग्राहकांकडून मिळालेला प्रतिसाद अत्यंत उत्साहवर्धक आहे, अशी प्रतिक्रिया भारती एअरटेलचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी रणदीप सेखॉन यांनी दिली.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Airtel has crossed over 1 million 5g customers in india zws
First published on: 03-11-2022 at 02:57 IST