भक्ती रसाळ bhakteerasal@gmail.com

‘जोखीम न घेणेही एक प्रकारची जोखीमच’ असते. त्यामुळे नेहमीच गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय योग्य असतो असे नाही. बऱ्याचदा गुंतवणुकीच्या मुदतपूर्तीवेळी मिळणारा परतावा हा महागाई दरापेक्षा कमी असतो. आपल्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळावा, अशी प्रत्येकाची अपेक्षा असते आणि परताव्याचा हा पैलू त्या गुंतवणुकीला असणाऱ्या जोखमीचा पदर कसा यावरूनही ठरतो. बऱ्याचदा गुंतवणूकदार  ‘जितकी जास्त जोखीम, तितका जास्त परतावा’ या निकषावर देखील गुंतवणूक करतात. मात्र गुंतवणूक ही मुख्यत्वे तीन निकषांवर तपासली जाते. गुंतवणुकीची पायाभूत त्रिसूत्री म्हणजे जोखीम, परतावा आणि रोकड सुलभता असते.

पारंपरिक गुंतवणुकीतील लोकप्रिय गुंतवणूक प्रकार एन्डॉव्हमेन्ट विमा योजना आहे. करबचत, अत्यल्प जोखीम, विमा हप्तय़ांचे विकल्प, मिळकतीनुसार लवचीकता. विशेषत: हमखास बोनस आणि मनीबँक हमी. सामान्य गुंतवणूकदार नेहमीच खात्रीशीर परतावा, हमखास बोनस, गॅरंटीड बोनस अशा तलाक वैशिष्टय़ांकडे झुकते माप टाकतो.

बाजारातील अस्थिरता, मुदत ठेवींवरील व्याजदर, भांडवली बाजारातील बेभरवशी परतावा अशा नकारात्मक वातावरणात भरवसा, हमी, मणी बॅक, असे शाश्वत, गुंतवणुकीतील मुद्दलविना जोखीम असणारे पर्याय जास्त फायदेशीर वाटणे स्वाभाविक आहे. 

गेल्या काही वर्षांत विमा क्षेत्रात युलिप योजना मोठय़ा प्रमाणावर ग्राहकास नुकसानदायक ठरल्यावर पुन्हा पारंपरिक विमा योजनांची मागणी पुन्हा वाढू लागली आहे, विमा योजना, संरक्षण कवच योजनेपेक्षा बचत योजना म्हणून जास्त परतावा आणि कर सवलत देते. या विक्रीच्या खेळीस ग्राहक बळी पडतो. कोणतीही गुंतवणूक ही मुख्यत्वे तीन निकषांवर तपासली जाते. गुंतवणुकीची पायाभूत त्रिसूत्री म्हणजे जोखीम, परतावा आणि रोकड सुलभता असते.

पारंपरिक विमा योजना म्हणजेच मनी बॅक, एन्डॉव्हमेन्ट योजना, गॅरंटीड बेनिफिट योजना या तीनही निकषांवर तपासून घेताना काही महत्त्वाच्या नोंदी हमखास आणि खात्रीशीर अशा विशेषणांच्या गारुडात निसटतात. मुद्दल म्हणजेच विमा हप्ता  न गमावता परत मिळतो या हमीपोटी ग्राहक अप्रत्यक्षरीत्या स्वाक्षरीने जास्त पैसा मोजण्यास तयार होतो. ग्राहकांच्या मानसिकतेचा आधार घेऊन अशा महागडय़ा योजना सहज खपविता येतात. सादर गुंतवणुकांचे तीनही सूत्रांनुसार मूल्यमापन केले असता बहुतांशी ग्राहकांना अशा योजनांवरील परतावा कोणत्या सूत्रानुसार मांडावा हेच माहीत नाही. सामान्यत: परतावा मोजण्यासाठी मुदत कमीत कमी १० ते अधिकाधिक ३० वर्षे असल्याने ग्राहक परिपूर्ण परतावा अभ्यासतो. आजचा व्याजदर जर मला तीस वर्षांनंतरही हमीपूर्वक मिळत  असेल तर तो निश्चितच लाभदायक आहे, असा गैरसमज दृढ झाल्याने चलनवाढ, दीर्घमुदतीत चक्रवाढीचे फायदे किंवा बोनस दरवर्षी बदलणार आहे की शाश्वत आहे अशा वस्तुनिष्ठ बाबींकडे दुर्लक्ष होते. विमा योजनांचे मूल्यमापन आरआरआरह्ण या परिणामावर होते.

गुंतवणुकांचे अंतर्गत परताव्यानुसार मूल्यमापन करताना मुदतीचा विचार केला जातो आरआरआरह्णनुसार  विमा योजना कमीत कमी चार टक्के ते अधिकाधिक सात टक्के आरआरआर मर्यादेतच परतावा देतात याचाच अर्थ चलनवाढीचा दर लक्षात घेतला तर या गुंतवणूक पैशांची बचत करतील पण गुंतवणुकीला वृिद्धगत करू शकत नाहीत.

ग्राहकवर्ग अशा योजनांद्वारे मिळकतीचा मोठा हिस्सा वर्षांनुवर्षे चक्रवाढ व्याजावर पाणी सोडत गाफील राहतो. मुळात अशा योजनांमध्ये रोकड तरलतेचा अभाव असतो.

तरलता अर्थात लिक्विडिटी नसल्यामुळे अशा चुका सुधारताना विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागतो. विमा तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच  हे निर्णय घेणे आर्थिक हिताचे ठरते.

गुंतवणुकीची मुदत : विमा योजनांतून मुदतपूर्व बाहेर पाडण्यासाठी सरेंडर, पेडअप आणि लॅप्सेशन हे मार्ग आहेत. मात्र कोणता मार्ग आर्थिकदृष्टय़ा कमी तोटय़ाचा हे ठरवण्यासाठी गुंतवणूकदारांचे संपूर्ण आर्थिक अंदाजपत्रक मांडावे लागते. केवळ परताव्याकडे लक्ष ठेवून अशा योजना सरेंडर करणेही नुकसानदायक ठरते. बहुतांशी योजनांद्वारे मिळणारे विमा संरक्षण कमाल २० लाख असते. त्यामुळे विमा संरक्षणाची कुटुंबाची गरज लक्षात घेऊनच विमा योजनांची पुनर्बाधणी करावी लागते.

कर सवलत : विमा योजनाचे कर बचतीस योगदान लक्षात घेताना ग्राहकांनी कर बचतीकरता मिळकतीचा किती हिस्सा दीर्घमुदतीसाठी समर्पित होत आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे. बऱ्याचदा कर बचतीपेक्षा  प्राप्तिकर भरल्यामुळेही गुंतवणुकीवर सकारात्मक परिणाम दिसून येतो. 

आरआरआर अंतर्गत परतावा : परताव्याचे आकलन करताना विमा योजना दीर्घ मुदतीत गृहीतकांवर आधारित आलेख मांडतात, ही गृहीतके आहेत. यामुळे कोणतेही निकस मांडताना परतावा गृहीत धरता येत नाही. सध्याच्या अस्थिर काळात चलनवाढीचा दर देखील गृहीत धरता येत नाहीत हे वास्तव आहे. २० किंवा ३० वर्षांनंतर मिळणाऱ्या रकमेवरील वर्तमानातील गृहीतके वास्तवाला धरून असतीलच असे नाही, म्हणजेच वर्तमानातील चलनवाढ, उपलब्ध चक्रवाढीचे पर्याय यांच्याशी तुलना करूनच नवीन गुंतवणूकदारांनी  निर्णय घेणे अपेक्षित आहे. जुने गुंतवणूकदार ज्यांनी कमाल दहा वर्षे भरणा केला आहे, त्यांनी मात्र नव्याने पुनर्बाधणी करणे अपेक्षित आहे.

पेड-अप : विमा योजनांसाठी ही  मुभा कमीत कमी नुकसानदायक ठरते. गुंतवणूकदारांनी विमा सल्लागाराकडून आपल्या योजनेची चालू पेड अप रक्कम नोंदवून घ्यावी. विमा योजनांची पुनर्बाधणी करताना ही नोंद महत्त्वाची ठरते.

येत्या तीन ते पाच वर्षांत ज्या योज़्‍ानेची मुदतपूर्ती होत आहे, अशा योजना मुदतपूर्ण होईपर्यंत चालू ठेवणेच आर्थिक हिताचे ठरते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लेखिका पात्रताधारक वित्तीय नियोजनकार आणि व्यावसायिक विमा सल्लागार