Chanakya Niti for happy married life: आचार्य चाणक्य यांनी सामाजिक कल्याणासाठी एक धोरण तयार केलं होतं, ज्याला ‘चाणक्य नीति’ असं म्हणतात. या धोरणात करिअर, यश, संपत्ती, मैत्री, प्रेमसंबंध, सन्मान आणि वैवाहिक जीवन यासह जवळपास प्रत्येक विषयाशी संबंधित सूचना देण्यात आल्या आहेत. असं मानलं जातं की चाणक्याची धोरणं आजही तितकीच प्रासंगिक आहेत जितकी हजारो वर्षांपूर्वी होती.

आचार्य चाणक्यजींनी त्यांच्या नीतिशास्त्रात स्त्रियांबद्दल तपशीलवार चर्चा केली आहे. आचार्य चाणक्यांचा असा विश्वास होता की, स्त्री एखाद्या व्यक्तीच्या जीवनात खूप महत्त्वाची भूमिका बजावते, मग ती आई म्हणून असो किंवा बहीण, मुलगी, मित्र आणि पत्नी म्हणून. स्त्रियांमध्ये तिच्या गुणांनी माणसाचं नशीब बदलण्याची ताकद असते. चाणक्य नीतीमध्ये पुरुषांसाठी भाग्यशाली ठरणाऱ्या महिलांचा उल्लेख करण्यात आला आहे. आचार्य चाणक्य यांच्या मते, जर एखाद्या स्त्री मध्ये असे गुण असतील तर लग्नानंतर तिच्या पतीचे भाग्य खुलते. तर ते कोणते गुण आहेत, आपण आज जाणून घेऊया…

हे गुण स्त्री मध्ये असावेत-

समाधानी स्त्री: आचार्य चाणक्य यांच्या मते स्त्री मध्ये समाधानाचा गुण असणं अत्यंत आवश्यक आहे. कारण समाधान हा सुखी जीवनाचा पाया आहे. अशी स्त्री नेहमी कुटुंबाला जोडून ठेवते. तसंच, अशी महिला प्रत्येक कठीण प्रसंगात आपल्या पतीची साथ देते.

धार्मिक विचार असलेली स्त्री: आचार्य चाणक्यजी मानत होते की, ज्या घरात रोज पूजा केली जाते, तिथे देवी लक्ष्मीचा निवास असतो. त्यामुळे ज्या महिला धार्मिक स्वभावाच्या असतात, त्यांच्या पतीचे भाग्य खुलते.

शांत राहणे : आचार्य चाणक्य यांनी क्रोध हा मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू असल्याचं सांगितलं आहे. आचार्य चाणक्यजी मानतात की, जी स्त्री रागवत नाही, ती आपल्या पतीसाठी खूप भाग्यवान असते. कारण क्रोधामुळे तुम्ही सर्व काही नष्ट करू शकता.

गोड बोली : चाणक्य नीतीमध्ये सांगितले आहे की ज्या स्त्रियांची वाणी गोड असते ती आपल्या पतीचे भाग्यही बदलू शकते. कारण गोड बोलून घरातील वातावरण नेहमी आनंदी आणि सुखी राहतं. त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा संचारत राहते.

संयम बाळगणारी स्त्री: आचार्य चाणक्यजी मानतात की, जीवनात यश मिळवण्यासाठी संयम बाळगणे खूप महत्वाचं आहे. म्हणूनच महिलांमध्ये हा गुण आवश्यक मानला जातो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे.)