Chandra Grahan 2022: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण ८ नोव्हेंबर रोजी होणार आहे. हे खग्रास चंद्रग्रहण ग्रस्तोदय रूपात संपूर्ण भारतात दिसेल. त्याचबरोबर या चंद्रग्रहणामध्ये २०० वर्षांनंतर दोन अशुभ योगही तयार होत आहेत, जे काही राशींसाठी अशुभ सिद्ध होऊ शकतात. दुसरीकडे ज्योतिषशास्त्रानुसार १५ दिवसांत दोन ग्रहण लागणे अशुभ मानले जाते. चला जाणून घेऊया कोणत्या राशीसाठी चंद्रग्रहण अशुभ सिद्ध होऊ शकते.

‘हे’ अशुभ योग तयार होत आहेत

ज्योतिष शास्त्रानुसार शनि आणि मंगळ समोरासमोर असल्यामुळे षडाष्टक योग, नीचभंग अशुभ योग तयार होत आहेत. त्याचबरोबर हा योग मेष आणि भरणी नक्षत्रात असेल. जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते तेव्हा चंद्रग्रहण होते. तसेच, चंद्रग्रहणाच्या ९ तास आधी सुतक सुरू होते.

( हे ही वाचा: नववर्ष ठरेल ‘या’ ३ राशींच्या लोकांसाठी भाग्यशाली; सूर्यदेव निर्मित ‘नीचभंग राजयोग’ मिळवून देणार प्रचंड धनलाभाची संधी)

‘या’ राशीच्या लोकांनी विशेष काळजी घ्यावी

मेष राशी

चंद्रग्रहण तुमच्यासाठी अशुभ सिद्ध होऊ शकते. कारण हे ग्रहण फक्त तुमच्या राशीत होत आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला आरोग्या संबंधित समस्या उद्भवू शकतात. तसेच वरिष्ठ किंवा इतर कोणाशीही तुमचा वाद होऊ शकतो. कुटुंबातील सदस्यांसोबत मतभेद होऊ शकतात. याशिवाय तुम्ही कुठेतरी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही वेळ अजिबात योग्य नाही. त्याच वेळी, पार्टनरशिपच्या कामात काही नुकसान होऊ शकते.

तूळ राशी

चंद्रग्रहण तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकते. यावेळी तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. तसेच जोडीदारासोबत एखाद्या गोष्टीवरून वाद होण्याची शक्यता आहे. नोकरीत विविध अडथळे येऊ शकतात. व्यावसायिकांसाठी हा काळ खूप आव्हानात्मक आहे. यावेळी वाहन जपून चालवावे. कारण अपघात होण्याची शक्यता आहे.

( हे ही वाचा: १३ नोव्हेंबरपर्यंत ‘या’ राशींच्या संपत्तीत होईल प्रचंड वाढ; बुधाच्या कृपेने अचानक पालटू शकते नशीब)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धनु राशी

धनु राशीच्या लोकांसाठी चंद्रग्रहण हानिकारक ठरू शकते. यावेळी तुम्हाला कुठलीतरी भीती सतावू शकते. तसेच, कामाच्या ठिकाणी किंवा वैयक्तिक जीवनात एखाद्या गोष्टीबद्दल तणाव असू शकतो. कोणताही जुनाट आजार तुम्हाला त्रास देऊ शकतो. त्याच वेळी, व्यवसायातील कोणताही मोठा करार अंतिम होईपर्यंत थांबू शकतो. त्याचबरोबर तुमच्यावर शनीच्या अर्धशतकाचा प्रभावही आहे. त्यामुळे तुम्ही लोकांनी ग्रहण काळात घराबाहेर पडणे टाळावे.