Malavya Rajyog and Bhadra Rajyog: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे एका निश्चित कालावधीनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होते. ग्रहांच्या राशी परिवर्तनामुळे शुभ योग किंवा राज योग निर्माण होतात. जूनमध्ये महापुरूष राजयोग निर्माण होणार आहे ज्यामध्ये शुक्र ग्रह वृषभ राशीत प्रवेश करून मालव्य राजयोग निर्माण करेल. तर बुध ग्रह स्वराशी असलेल्या मिथुन राशीत प्रवेश करेल. ज्याच्या प्रभावाने काही राशींच्या व्यक्तींचे भाग्य चमकण्यास मदत होईल.
‘या’ तीन राशींचे भाग्य उजळणार
वृषभ (Vrushabh Rashi)
वृषभ राशीच्या व्यक्तींना भद्र आणि मालव्य राजयोग प्रत्येक क्षेत्रात यश देईल. या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात प्रचंड यश मिळेल आणि उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. तसेच, बेरोजगार लोकांना यावेळी नवीन नोकरी मिळू शकते. त्याचबरोबर नोकरदार लोकांना प्रमोशन मिळू शकते. तसेच, यावेळी, तुमच्या वडिलांबरोबरच्या नातेसंबंधात सुधारणा होईल. तुमचा मान-सन्मान वाढेल. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल, आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे.
मिथुन (Mithun Rashi)
मिथुन राशीच्या व्यक्तींनादेखील मालव्य आणि भद्र राजयोगाचा शुभ परिणाम अनुभवायला मिळेल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होण्यास मदत होईल. या काळात तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. भौतिक सुखात वाढ होईल. तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल आणि तुम्ही जमीन आणि वाहन खरेदीच्या दिशेने वाटचाल कराल. जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला चांगला नफा मिळेल. निर्यात आणि आयात व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो. या काळात मुलांकडून आनंदी वार्ता येतील.
सिंह (Singh Rashi)
सिंह राशीसाठी हा योग खूप अनुकूल ठरेल. या काळात तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. भौतिक सुखात वाढ होईल. तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल आणि तुम्ही जमीन आणि वाहन खरेदीच्या दिशेने वाटचाल कराल. जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला चांगला नफा मिळेल. निर्यात आणि आयात व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो. या काळात मुलांकडून आनंदी वार्ता येतील.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)