Surya Grahan 2022: हिंदू धर्मात सूर्य आणि चंद्रग्रहणाला विशेष महत्त्व आहे. तसेच ज्या दिवशी सूर्यग्रहण असते त्या दिवशी अनेक नियम पाळले जातात. या वर्षी २०२२ मध्ये दोन सूर्यग्रहण होतील. ३० एप्रिलच्या मध्यरात्री वर्षातील पहिले सूर्यग्रहण होत आहे. मात्र हे सूर्यग्रहण अर्धवट असेल. हे ग्रहण मध्यरात्री १२.१५ वाजता सुरू होईल आणि पहाटे ४.८ पर्यंत चालेल.

तसंच ग्रहण मेष राशीत होणार आहे. मेष राशीचा स्वामी मंगळ ग्रह आहे. त्यामुळे या ग्रहणाचे महत्त्व वाढते. परंतु वैदिक दिनदर्शिकेनुसार हे ग्रहण भारतात अदृश्यच राहील, म्हणजे ते दिसणार नाही किंवा सुतक काळ मानला जाणार नाही. हे ग्रहण दक्षिण अमेरिकेच्या नैऋत्य भागात, प्रशांत महासागर, अटलांटिक आणि दक्षिण ध्रुवावर दिसणार आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा जेव्हा ग्रहण होते तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर होतो. त्यामुळे या ग्रहणाचा काही ना काही प्रभाव सर्व राशींवर नक्कीच दिसून येईल. पण ३ राशी आहेत, ज्यांच्यासाठी हे ग्रहण फायदेशीर ठरू शकते. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत ही ३ राशी.

वृषभ : या राशीच्या लोकांसाठी हे ग्रहण लाभदायक ठरू शकते. सूर्यग्रहणामुळे तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो. तसेच दीर्घकाळ रखडलेली कामेही करता येतील. व्यवसायात चांगला फायदा होऊ शकतो. नवीन व्यावसायिक संबंध निर्माण होऊ शकतात. यावेळी तुम्ही व्यवसायात नवीन गुंतवणूक करू शकता. ज्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होऊ शकतो. तसंच आपण मुलाच्या बाबतीत काही शुभ माहिती मिळवू शकता.

आणखी वाचा : Ketu Gochar: १२ एप्रिल रोजी छाया ग्रह केतुचे भ्रमण होईल, या ३ राशींच्या संपत्तीत वाढ होईल

कर्क राशी: हे ग्रहण तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. तसंच या काळात कामाच्या ठिकाणी आणि समाजात तुमची प्रतिमा चांगली होऊ शकते. नशिबाची पूर्ण साथ मिळेल. यासह, कामाच्या ठिकाणी तुमची कार्यशैली सुधारू शकते, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये प्रशंसा मिळू शकते. त्याचबरोबर तुम्हाला कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. नवीन योजनेवर काम करू शकता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धनु: सूर्यग्रहणाच्या प्रभावाने तुम्हाला व्यवसाय आणि करिअरमध्ये यश मिळू शकते. तसेच, भागीदारीचे काम फायदेशीर ठरू शकते. त्याचबरोबर जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील आणि जोडीदाराचे सहकार्यही मिळेल. या काळात तुमची ताकदही वाढेल. यासोबत गुप्त शत्रूंचा नाश होईल. धनु राशीचा स्वामी गुरु ग्रह आहे आणि ज्योतिष शास्त्रानुसार गुरु आणि सूर्य ग्रहामध्ये मैत्रीची भावना आहे. त्यामुळे हे ग्रहण तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.